शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

जैन तत्त्वज्ञानात मानवकल्याणाचा संदेश : राजनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 3:07 AM

जैन धर्म हा विज्ञाननिष्ठ धर्म आहे. या धर्माने जगाला अहिंसा, शांती, त्यागाचा संदेश दिला. जैन तत्त्वज्ञानाचे मूलतत्त्वच मानवकल्याण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी श्रवणबेळगोळ येथे केले.

सांगली : जैन धर्म हा विज्ञाननिष्ठ धर्म आहे. या धर्माने जगाला अहिंसा, शांती, त्यागाचा संदेश दिला. जैन तत्त्वज्ञानाचे मूलतत्त्वच मानवकल्याण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी श्रवणबेळगोळ येथे केले.श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या नवव्या दिवशी राजनाथ सिंह यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते धर्मध्वजाचे उद््घाटन करण्यात आले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, खा. अजय संचेती, आ. एम. ए. गोपाळस्वामी, कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या महामस्तकाभिषेक महोत्सव समितीचे सहअध्यक्ष के. अभयचंद्र जैन उपस्थित होते. चारुकीर्ती भट्टारक स्वामी यांच्याहस्ते चांदीचा कलश देऊन राजनाथ सिंह यांचा सत्कार करण्यात आला. राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय संस्कृतीतील जैन धर्म हा अनमोल रत्न आहे. आज जगात सर्वत्र स्पर्धा, हिंसेचे वातावरण आहे. त्यातून जैन धर्माचे तत्त्वज्ञानच जगाची सुटका करेल. जैन धर्माने मानव कल्याणाचा विचार ठेवला आहे. अहिंसा, शांती, त्याग ही तत्त्वेच जैन धर्माचा पाया आहेत. हा धर्म पूर्णपणे विज्ञाननिष्ठ आहे. भगवान बाहुबलींनीही शांती, सदभावनेचा संदेश दिला होता. सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.श्रवणबेळगोळला अहिंसा क्षेत्र घोषित करा - वर्धमानसागरश्रवणबेळगोळ येथून भगवान बाहुबलींच्या अहिंसा, त्याग या संदेशाचा प्रसार जगभर होत आहे. त्यामुळे श्रवणबेळगोळला अहिंसा क्षेत्र म्हणून घोषित करावे. भगवान महावीर यांची जन्मभूमी असलेल्या वैशाली (बिहार) येथील जैन मंदिरातून त्यांची मूर्ती चोरीला गेली आहे. त्याचाही शोध घ्यावा, अशी मागणी आचार्य वर्धमानसागर महाराज यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे केली.चारुकीर्ती महाराज यांनी ताजमहालप्रमाणे भगवान बाहुबलींच्या मूर्तीलाही केंद्र शासनाने संरक्षण पुरवावे, अशी मागणी केली. या मागण्यांवर निश्चित विचार करण्याची ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह