शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ऊस दराबाबत कारखानदारांचे मौनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 4:27 PM

कारखानदारांची ही भूमिका लक्षात घेतल्यास, राजू शेट्टी यांनी जाहीर केलेली एफआरपी अधिक २०० रुपये शेतक-यांच्या पदरात पडतील, अशी परिस्थिती दिसत नाही. यामुळे शेतकºयांनी सावध भूमिका घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देमहापूर आणि अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादकांसह सर्वच शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये उसाला दर किती असणार, कारखानदारांच्या मौनाबाबत शेतक-यांमध्येही उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी, एफआरपी अधिक २०० रुपये कारखानदारांनी जाहीर करुन गळीत हंगाम सुरु करण्याचे आवाहन केले होते. सांगली जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले आहेत. पण, एकाही कारखान्याने दराची घोषणा केलेली नाही. साखर कारखानदारांशी संपर्क केला असता, त्यांनी दराच्या कोंडीबाबत सावध भूमिका घेत बोलणे टाळले आहे. कारखानदारांच्या मौनाबाबत शेतक-यांमध्येही उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.

महापूर आणि अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादकांसह सर्वच शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये उसाला दर किती असणार, याकडे शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारखानदार गळीत हंगाम सुरु करताना दराची नेहमीच घोषणा करतात. पण, यावर्षी सर्वच कारखानदारांनी गळीत हंगाम सुरु करताना दराची घोषणाच केली नाही.

कारखानदारांच्या या भूमिकेवर शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऊस दराच्या कोंडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, जोशीप्रणित शेतकरी संघटना गप्पच आहेत. ऊस दराबाबत साखर कारखानदारांशी संपर्क साधला असता, अनेकांनी, आमची कशाला प्रतिक्रिया? असे म्हणून बोलणेच टाळले. काही कारखानदारांनी शेतकºयांना योग्य दर मिळेल, असे पोकळ आश्वासन दिले. साखर कारखानदारांच्या या मौनामध्ये दडलंय काय, असा सवालही शेतक-यांनी उपस्थित केला आहे.

काही कारखानदारांनी तर एकरकमी एफआरपी देणेही कठीण असल्याचे सांगितले आहे. साखरेचे दर वाढले नसल्यामुळे एफआरपी तीन टप्प्यामध्ये देण्याचा कारखानदारांचा विचार सुरु आहे. पहिल्या टप्प्यात ८० टक्के, दुसरे दोन टप्पे १० टक्के देण्याबाबत साखर कारखानदारांमध्ये चर्चा चालू आहे. कारखानदारांची ही भूमिका लक्षात घेतल्यास, राजू शेट्टी यांनी जाहीर केलेली एफआरपी अधिक २०० रुपये शेतक-यांच्या पदरात पडतील, अशी परिस्थिती दिसत नाही. यामुळे शेतकºयांनी सावध भूमिका घेण्याची गरज आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने