शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

महाविकास आघाडीने बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेऊ नये : रामदास आठवले 

By संतोष भिसे | Published: March 18, 2024 4:57 PM

'संविधान बदलाची भाषा करणाऱ्या हेगडेंचा निषेध'

सांगली : बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीत जातील असे वाटत नाही. आघाडीनेही त्यांना घेऊ नये. ते मोदींविरोधात असले, तरी मी मोदींच्या पाठीशी ठाम आहे. बाळासाहेब यांनी विरोधी भूमिका घेता कामा नये असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले.सांगलीत ते पत्रकार बैठकीत बोलत होते. ते म्हणाले, राहुल गांधी यांना बघायला लोक येतात. त्याचे रुपांतर मतात होणार नाही. त्यांना पंतप्रधानपद मिळेल कि नाही हे माहिती नाही. मनमोहन सिंग यांच्यावेळीच पंतप्रधान बनवायला हवे होते. काँग्रेसचे युग संपलेले नाही, पण चांगले दिवस येण्याची शक्यता नाही. केरळमध्ये त्यांना एकही जागा मिळणार नाही. या निवडणुकांत आम्ही उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये एकही उमेदवार उभा करणार नाही. तेथे भाजपला पाठबळ देऊ.आठवले म्हणाले, राहुल गांधींना भारत जोडण्याची आवश्यकता नाही, ते काम मोदींनी यापूर्वीच केले आहे. त्यांना फार जागा मिळणार नाहीत. मोदी मुस्लिमविरोधी नाहीत. त्यांनी राबविलेल्या योजनांचा फायदा सर्व जातीधर्मांना होत आहे. भाजप यावेळी ३७० पेक्षा जास्त जागा मिळवेल. रिपब्लिकन पक्ष मोदींच्या मागे ताकदीने उभा आहे. पण मोदींनी जागावाटपात आम्हाला डावलू नये. आमचा मतदार कमी असला तरी निर्णायक आहे. जिल्हा पातळीवर नियोजन समिती किंवा स्थानिक समित्यावर आमच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. ते म्हणाले, लोकसभेसाठी शिर्डी व सोलापूरच्या जागा मिळाव्यात अशी पत्रे देवेंद्र फडणवीस, अमित शाह, जे. पी. नड्डा, चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली आहेत. मला शिर्डी किंवा सोलापूर मिळाले तर तेथे लढेन. निवडणुकीमुळे आमच्या पक्षाला मान्यता मिळेल. फडणवीस यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. आम्हाला जागा नाही दिल्या तर समाजात नाराजी पसरेल. जागा मिळणे हा आमचा हक्क आहे. जुन्या मित्रांना विसरू नये अशी भाजपला विनंती आहे.यावेळी रिपाईंचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सचिव सुरेश बारशिंगे, सूर्यकांत वाघमारे, परशुराम वाडेकर, जगन्नाथ ठोकळे, अण्णा वायदंडे, श्वेतपद्म कांबळे, सचिन सवाखंडे आदी उपस्थित होते.

हेगडेंवर कारवाईची मागणीआठवले म्हणाले, कर्नाटकचे भाजप नेते अनंतकुमार हेगडे नेहमीच दलितविरोधी भूमिका मांडतात. पण भाजप व मोदी यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. संविधान बदलण्याचा अधिकार कोणाला नाही. ज्यांना बदलायचे आहे, त्यांनी देशात राहू नये. संविधान बदलाची भाषा करणाऱ्या हेगडेंचा मी निषेध करतो. त्यांच्यावर कारवाईसाठी नड्डा यांना पत्र पाठवू.

.. तर आमचे १०-१२ मंत्री असतेआठवले म्हणाले, शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली होती. पण बाळासाहेब आंबेडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आम्ही एकत्र आलो असतो, तर शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात आमचे १०-१२ मंत्री होऊ शकले असते.

टॅग्स :SangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी