शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

महात्मा फुले यांनी उच्चवर्णीयांच्या वर्तुळातून संमेलने मुक्त केली - तारा भवाळकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:05 IST

'माणूस सुसंस्कृत, संयमी, विचारशील व्हावा यासाठी संमेलने आवश्यक'

सांगली : जीवनाच्या विकासासाठी संमेलने आवश्यक आहेत. महात्मा फुले यांनी साहित्य संमेलनाला उच्चवर्णीयांच्या वर्तुळातून बाहेर काढले, असे प्रतिपादन दिल्लीतील ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले.सांगलीत सोमवारी महापालिकेच्या वसंत व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. ''साहित्य संमेलनाचे प्रयोजन` या विषयावर त्यांनी भूमिका मांडली. आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, स्त्री सखी महिला मंडळाच्या अध्यक्षा विद्या जोशी यावेळी उपस्थित होते. डॉ. भवाळकर म्हणाल्या, वेगवेगळ्या विचारधारातून वेगवेगळे पंथ आले. या विचारवंतांच्या विचारधारेतून साहित्य संमेलन निर्माण झाले. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून इतिहासाकडे पहायला हवे. त्यातूनच जीवनाचा विकास होत गेला. शहाणपण येत गेले. ज्ञानाच्या परंपरेत जीवन जगण्याचे शास्त्र असते. भवाळकर म्हणाल्या, सांगली जिल्ह्यात वर्षाला १०-१२ संमेलने होतात. समाजाच्या सांस्कृतिक आणि मानसिक विकासासाठी संमेलने आवश्यक आहेत. माणूस सुसंस्कृत, संयमी, विचारशील व्हावा यासाठी संमेलने आवश्यक आहेत. सूत्रसंचालन चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांनी केले. सहायक आयुक्त शिल्पा दरेकर यांनी आभार मानले. संयोजन वि. स. खांडेकर वाचनालयाने केले.सध्या अनेक प्रकारची संमेलनेडॉ. भवाळकर म्हणाल्या, पुण्यात पहिले साहित्य संमेलन झाले, तेव्हा बहुजन नुकतेच शिकायला लागले होते. ''हे फक्त खालमोडे दादांचे (फक्त पुस्तके वाचणारे) संमेलन'' असे महात्मा फुले म्हणायचे. संमेलनाला उच्चवर्णीयांच्या वर्चस्वातून फुले यांनीच बाहेर काढले. विशिष्ट वर्गातून पुढे त्याचा विस्तार होत गेला. आता तर निरनिराळ्या व्यावसायिकांचीही संमेलने होत आहेत. यंदा शेतकऱ्यांचेही संमेलन झाले. सध्या अनेक प्रकारची संमेलने होत आहेत