शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महाराष्ट्र सरकारने 'हे' काम करावं, संभाजी भिंडेंनी पुनर्वसनासाठी सुचवला मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 12:16 IST

यापूर्वी 2005 साली पूर आला होता, त्यावेळी लोकं म्हणत होते की 60 वर्षांपूर्वी असा पूर आला होता.

ठळक मुद्देयापूर्वी 2005 साली पूर आला होता, त्यावेळी लोकं म्हणत होते की 60 वर्षांपूर्वी असा पूर आला होता. सांगली अन् कोल्पाहुरात आता पाणी ओसरल्याने संपूर्ण शहरं उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळत आहेत.

सांगली - कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या महापुरानंतर आता तेथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, हजारो संसार पाण्याखाली गेल्यानं लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आलंय. पूर ओसरल्यानंतर गावागावात आणि घराघरात चिखल झाला आहे. आता, हे गाव पुन्हा उभारायचं कसं? पुन्हा आपलं घर सावरायचं कसं? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सांगलीतील गुरुजी आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुनर्वसनासाठी एक मार्ग सूचवला आहे. 

यापूर्वी 2005 साली पूर आला होता, त्यावेळी लोकं म्हणत होते की 60 वर्षांपूर्वी असा पूर आला होता. मात्र, आता आलेला पूर अतिशय मोठा आहे, हे संकट खूप मोठं आहे. निसर्गापुढं सर्वांची अक्कल शून्य असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे या पुनर्वसनासाठी मोठं काम करावं लागेल. सैन्य चालतं ते सेनापतीच्या बळावर चालतं. सेनापती जर कुशल असेल तर उत्तम. काल रात्री बारा वाजता मला कळालं की, महाराष्ट्र शासनानं जे खेबुडकर होते, त्यांना परत इथे आणलं आहे. सरकारनं ही फार मोठी चांगली गोष्ट केली आहे. पण, आणखी एक गोष्ट केली पाहिजे, सेनापती म्हणून काम करण्यास खेबुडकर योग्य आहेत. तसेच, काळम पाटील आणले पाहिजेत, अफाट चांगला मनुष्य. पण दुर्दैवाने ते सेवानिवृत्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने ताबडतोब त्यांना इथं आणावं, अशी अपेक्षा संभाजी भिडे यांनी व्यक्त केली आहे. तसं केल्यास सगळ्या परिस्थितीत ताबडतोब फरक पडतो. यशा राजा-तथा प्रजा, जसा नेता-तशी जनता असे म्हणत काळम पाटील या सेवानिवृत्त आयएएस दर्जाच्या व्यक्तीला पुनर्वसन कामासाठी आणलं पाहिजे, असे संभाजी भिंडेंनी म्हटले आहे. 

सांगली अन् कोल्पाहुरात आता पाणी ओसरल्याने संपूर्ण शहरं उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळत आहेत. आज सांगलीमधील हंडेपाटील तालीम रोडमध्ये शिवप्रतिष्ठान आणि त्यांचे संस्थापन संभाजी भिडे यांनी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निसर्गाच्या आपत्तीला आधुनिकीकरण जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी, बोलताना संभाजी भिडेंना अश्रू अनावर झाले होते. आईच्या काळजाप्रमाणं प्रत्येकानं या मदत कार्यात स्वत:ला झोकून दिलं पाहिजे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पुढील महिनाभर स्वत:चं बाजुला सारुन इतरांच्या दु:खात, पुनर्वसनात मदत करण्याचं सांगितल्यांचही भिडेंनी म्हटलं. 

कोण आहेत काळम पाटील ?विजयकुमार काळम पाटील यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलं होतं. याचवर्षी ते सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या कार्यकाळात, सांगलीकरांवर पाटील यांनी आणि पाटलांवर सांगलीकरांनी खूप प्रेम केलं. एक आदर्श जिल्हाधिकारी म्हणून पाटील हे सवपरिचित आहेत. काळम पाटील यांना आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कारानेही गौरवित करण्यात आले आहे. त्यामुळेच, ही पूरस्थिती हाताळण्यासाठी काळम पाटील यांना परत बोलावण्याची मागणी संभाजी भिंडेंनी केली आहे.   

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीSangliसांगलीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार