शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सरकारने 'हे' काम करावं, संभाजी भिंडेंनी पुनर्वसनासाठी सुचवला मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 12:16 IST

यापूर्वी 2005 साली पूर आला होता, त्यावेळी लोकं म्हणत होते की 60 वर्षांपूर्वी असा पूर आला होता.

ठळक मुद्देयापूर्वी 2005 साली पूर आला होता, त्यावेळी लोकं म्हणत होते की 60 वर्षांपूर्वी असा पूर आला होता. सांगली अन् कोल्पाहुरात आता पाणी ओसरल्याने संपूर्ण शहरं उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळत आहेत.

सांगली - कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या महापुरानंतर आता तेथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, हजारो संसार पाण्याखाली गेल्यानं लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आलंय. पूर ओसरल्यानंतर गावागावात आणि घराघरात चिखल झाला आहे. आता, हे गाव पुन्हा उभारायचं कसं? पुन्हा आपलं घर सावरायचं कसं? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सांगलीतील गुरुजी आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुनर्वसनासाठी एक मार्ग सूचवला आहे. 

यापूर्वी 2005 साली पूर आला होता, त्यावेळी लोकं म्हणत होते की 60 वर्षांपूर्वी असा पूर आला होता. मात्र, आता आलेला पूर अतिशय मोठा आहे, हे संकट खूप मोठं आहे. निसर्गापुढं सर्वांची अक्कल शून्य असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे या पुनर्वसनासाठी मोठं काम करावं लागेल. सैन्य चालतं ते सेनापतीच्या बळावर चालतं. सेनापती जर कुशल असेल तर उत्तम. काल रात्री बारा वाजता मला कळालं की, महाराष्ट्र शासनानं जे खेबुडकर होते, त्यांना परत इथे आणलं आहे. सरकारनं ही फार मोठी चांगली गोष्ट केली आहे. पण, आणखी एक गोष्ट केली पाहिजे, सेनापती म्हणून काम करण्यास खेबुडकर योग्य आहेत. तसेच, काळम पाटील आणले पाहिजेत, अफाट चांगला मनुष्य. पण दुर्दैवाने ते सेवानिवृत्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने ताबडतोब त्यांना इथं आणावं, अशी अपेक्षा संभाजी भिडे यांनी व्यक्त केली आहे. तसं केल्यास सगळ्या परिस्थितीत ताबडतोब फरक पडतो. यशा राजा-तथा प्रजा, जसा नेता-तशी जनता असे म्हणत काळम पाटील या सेवानिवृत्त आयएएस दर्जाच्या व्यक्तीला पुनर्वसन कामासाठी आणलं पाहिजे, असे संभाजी भिंडेंनी म्हटले आहे. 

सांगली अन् कोल्पाहुरात आता पाणी ओसरल्याने संपूर्ण शहरं उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळत आहेत. आज सांगलीमधील हंडेपाटील तालीम रोडमध्ये शिवप्रतिष्ठान आणि त्यांचे संस्थापन संभाजी भिडे यांनी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निसर्गाच्या आपत्तीला आधुनिकीकरण जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी, बोलताना संभाजी भिडेंना अश्रू अनावर झाले होते. आईच्या काळजाप्रमाणं प्रत्येकानं या मदत कार्यात स्वत:ला झोकून दिलं पाहिजे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पुढील महिनाभर स्वत:चं बाजुला सारुन इतरांच्या दु:खात, पुनर्वसनात मदत करण्याचं सांगितल्यांचही भिडेंनी म्हटलं. 

कोण आहेत काळम पाटील ?विजयकुमार काळम पाटील यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलं होतं. याचवर्षी ते सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या कार्यकाळात, सांगलीकरांवर पाटील यांनी आणि पाटलांवर सांगलीकरांनी खूप प्रेम केलं. एक आदर्श जिल्हाधिकारी म्हणून पाटील हे सवपरिचित आहेत. काळम पाटील यांना आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कारानेही गौरवित करण्यात आले आहे. त्यामुळेच, ही पूरस्थिती हाताळण्यासाठी काळम पाटील यांना परत बोलावण्याची मागणी संभाजी भिंडेंनी केली आहे.   

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीSangliसांगलीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार