शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

खानापूर मतदारसंघात साखर कारखान्यांच्या धुराड्याचा मुद्दा तापला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 18:22 IST

संदीप माने खानापूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी खानापूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ...

संदीप मानेखानापूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी खानापूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात आटपाडीच्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे धुराडे मीच पेटवणार असे ठासून सांगितले. त्यामुळे खानापूर मतदारसंघातील बंद कारखान्यांच्या धुराड्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे.खानापूर मतदारसंघामध्ये आटपाडीचा माणगंगा व नागेवाडीचा यशवंत हे दोन सहकार क्षेत्रातले साखर कारखाने स्थापन करण्यात आले होते. खानापूरचे माजी आमदार संपतराव माने यांनी नागेवाडीच्या माळरानावर यशवंत सहकारी साखर कारखाना व आटपाडीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब देशमुख यांनी आटपाडीच्या फोंड्या माळावर माणगंगा सहकारी साखर कारखाना उभारला. पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष व उसाची कमतरता असतानाही हे कारखाने चांगल्या स्थितीमध्ये चालवून कर्जमुक्त करण्यात आले. मात्र, त्यानंतर दुष्काळी भागामुळे उसाची प्रचंड कमतरता, बेसुमार कामगार भरती व कारखान्यातील राजकारण यामुळे या कारखान्यावरील कर्जाचा बोजा वाढत जाऊन या कारखान्यांची धुराडी बंद पडली.खानापूर व आटपाडी तालुक्यातील लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे हे दोन कारखाने काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. या भागामध्ये पाण्याची टंचाई असल्याने ऊस क्षेत्र कमी होते. त्यामुळे कारखान्यांचा मुद्दा मागील निवडणुकांमध्ये फारसा पटलावर आला नाही. मात्र, आता खानापूर व आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आले. यावर्षी प्रचंड पाऊस पडल्याने ऊस क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. हक्काचे कारखाने बंद असल्याने हा ऊस कुठे घालायचा, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. त्यामुळे शेतकरी याबाबत नेत्यांकडे विचारणा करू लागले आहेत.

माणगंगा कारखान्याचा मुद्दा ऐरणीवर..हाच मुद्दा पकडत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आमदारकीपेक्षा माझ्यासाठी कारखाना महत्त्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत माणगंगेचे धुराडे पेटवणारच, अशी घोषणा आटपाडी येथील देशमुख गटाच्या मेळाव्यात केली होती. हा कारखाना चालू करण्यासाठी सर्व नेत्यांना भेटणार असून, जो सहकार्य करील त्याच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. हाच धागा पकडत जयंत पाटील यांनी खानापुरात कारखान्याच्या धुराड्याच्या मुद्याला हवा दिल्याने खानापूर मतदारसंघाचे राजकारण तापले आहे.

धुराड्यावर करेक्ट कार्यक्रमखानापूर मतदारसंघामध्ये शिंदेसेनेकडून सुहास बाबर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील व अपक्ष राजेंद्रअण्णा देशमुख रिंगणात आहेत. ‘यशवंत’ कारखान्यावर बाबर गटाची सत्ता होती. माणगंगेवर देशमुख गटाची सत्ता होती. त्यामुळे धुराड्याच्या मुद्यावरून जयंत पाटील कुणाचा करेक्ट कार्यक्रम करतात की विरोधक त्यांचा डाव हाणून पाडतात, हे मतमोजणीनंतरच समजणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४khanapur-acखानापूरSugar factoryसाखर कारखानेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024