शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

खानापूर मतदारसंघात साखर कारखान्यांच्या धुराड्याचा मुद्दा तापला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 18:22 IST

संदीप माने खानापूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी खानापूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ...

संदीप मानेखानापूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी खानापूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात आटपाडीच्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे धुराडे मीच पेटवणार असे ठासून सांगितले. त्यामुळे खानापूर मतदारसंघातील बंद कारखान्यांच्या धुराड्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे.खानापूर मतदारसंघामध्ये आटपाडीचा माणगंगा व नागेवाडीचा यशवंत हे दोन सहकार क्षेत्रातले साखर कारखाने स्थापन करण्यात आले होते. खानापूरचे माजी आमदार संपतराव माने यांनी नागेवाडीच्या माळरानावर यशवंत सहकारी साखर कारखाना व आटपाडीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब देशमुख यांनी आटपाडीच्या फोंड्या माळावर माणगंगा सहकारी साखर कारखाना उभारला. पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष व उसाची कमतरता असतानाही हे कारखाने चांगल्या स्थितीमध्ये चालवून कर्जमुक्त करण्यात आले. मात्र, त्यानंतर दुष्काळी भागामुळे उसाची प्रचंड कमतरता, बेसुमार कामगार भरती व कारखान्यातील राजकारण यामुळे या कारखान्यावरील कर्जाचा बोजा वाढत जाऊन या कारखान्यांची धुराडी बंद पडली.खानापूर व आटपाडी तालुक्यातील लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे हे दोन कारखाने काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. या भागामध्ये पाण्याची टंचाई असल्याने ऊस क्षेत्र कमी होते. त्यामुळे कारखान्यांचा मुद्दा मागील निवडणुकांमध्ये फारसा पटलावर आला नाही. मात्र, आता खानापूर व आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आले. यावर्षी प्रचंड पाऊस पडल्याने ऊस क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. हक्काचे कारखाने बंद असल्याने हा ऊस कुठे घालायचा, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. त्यामुळे शेतकरी याबाबत नेत्यांकडे विचारणा करू लागले आहेत.

माणगंगा कारखान्याचा मुद्दा ऐरणीवर..हाच मुद्दा पकडत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आमदारकीपेक्षा माझ्यासाठी कारखाना महत्त्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत माणगंगेचे धुराडे पेटवणारच, अशी घोषणा आटपाडी येथील देशमुख गटाच्या मेळाव्यात केली होती. हा कारखाना चालू करण्यासाठी सर्व नेत्यांना भेटणार असून, जो सहकार्य करील त्याच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. हाच धागा पकडत जयंत पाटील यांनी खानापुरात कारखान्याच्या धुराड्याच्या मुद्याला हवा दिल्याने खानापूर मतदारसंघाचे राजकारण तापले आहे.

धुराड्यावर करेक्ट कार्यक्रमखानापूर मतदारसंघामध्ये शिंदेसेनेकडून सुहास बाबर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील व अपक्ष राजेंद्रअण्णा देशमुख रिंगणात आहेत. ‘यशवंत’ कारखान्यावर बाबर गटाची सत्ता होती. माणगंगेवर देशमुख गटाची सत्ता होती. त्यामुळे धुराड्याच्या मुद्यावरून जयंत पाटील कुणाचा करेक्ट कार्यक्रम करतात की विरोधक त्यांचा डाव हाणून पाडतात, हे मतमोजणीनंतरच समजणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४khanapur-acखानापूरSugar factoryसाखर कारखानेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024