शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

..त्यामुळेच सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी; उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी भाजपवरही केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:55 IST

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख रुपयांच्या अपहाराचे प्रकरण दडपण्यासाठीच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपकडून ...

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख रुपयांच्या अपहाराचे प्रकरण दडपण्यासाठीच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपकडून ईडी, सीबीआय यंत्रणांचा धाक दाखवून काँग्रेस फोडली आहे, असा आरोप काँग्रेसचे सांगली विधानसभेचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच, काँग्रेस फोडण्यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मिरजेतील निकटवर्तीय यांचा हात असल्याचेही ते म्हणाले.पाटील म्हणाले, वसंतदादा बँक अपहारप्रकरणी बँकेच्या २७ माजी संचालक आणि मयत संचालकाचे ११ वारसदार, दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल आहे. १०१ मालमत्तांवर सरकारने टाच आणली होती. त्या मालमत्ता जप्तीचे आदेशही दिले होते. मात्र, भाजपने ही फाइल कटकारस्थान करण्यासाठी राखून ठेवली होती. या चौकशीला तत्कालीन भाजप सरकारने २०१८ साली स्थगिती दिली. आता डाव साधून २०२२ साली प्रकरणाची फेरचौकशी लावली.चार वर्षे शांत झालेले चौकशीचे भूत पुन्हा एकदा मानगुटीवर बसवले. २०२१ ला फोडाफोडी करून राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर ही फाइल पुन्हा उघडली. या प्रकरणात भाजपने बारकाईने कट शिजवला. ईडी, सीबीआय, जेल, लिलाव अशा धमक्या दिल्या गेल्या. निवडणुकीची तयारी नसताना त्यांनी उमेदवारीसाठी दावा केला. विधान परिषदेचे सदस्यत्व नाकारले. हे का झाले? यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या मिरजेतील निकटवर्तीयाने या बंडाचे डील केले. आता हे धर्मसंकट असल्याचे सांगून कृपया मतदारांची दिशाभूल करू नये. हे धर्मसंकट नसून भाजपचा कट आहे. त्यांच्या भोवतीच्या बडव्यांनी काँग्रेससोबत केलेली गद्दारी आहे.

बडव्यांनी बंड उभा केलेबहुजन समाज या चक्रव्यूहात अडकणार नाही, कारण आमदार सुधीर गाडगीळ यांनी मैदानातून काढलेला पळ हा वसंतदादा बँकेच्या आडून केलेला कट फसत असल्याने होता. अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्याने स्वतः लक्ष घालून या प्रकरणात दबावतंत्र वापरले आणि बडव्यांनी बंड उभा केले. डॉ. विश्वजीत कदम यांना या बडव्यांचा डाव कळालेला आहे, म्हणूनच त्यांनी वहिनींना फितवणाऱ्यांची खैर नाही, असा इशारा दिला आहे, असेही पाटील म्हणाले.

ठेवीदारांच्या मुलांची शिक्षणे थांबलीपृथ्वीराज पाटील म्हणाले, वसंतदादा बँकेत अपहारामुळे दहा हजारांहून अधिक ठेवीदार कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. ठेवीदारांच्या मुलाबाळांना उपाशी राहावे लागले. मुलीच्या लग्नाला पैसे मिळाले नाहीत, मुलांची शिक्षणे थांबली. ज्येष्ठ नागरिकांना औषधाला, उपचाराला पैसे मिळाले नाहीत. लोकांना हे माहिती आहे. लोक शहाणे आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीcongressकाँग्रेसBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024