शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

..त्यामुळेच सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी; उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी भाजपवरही केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:55 IST

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख रुपयांच्या अपहाराचे प्रकरण दडपण्यासाठीच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपकडून ...

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख रुपयांच्या अपहाराचे प्रकरण दडपण्यासाठीच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपकडून ईडी, सीबीआय यंत्रणांचा धाक दाखवून काँग्रेस फोडली आहे, असा आरोप काँग्रेसचे सांगली विधानसभेचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच, काँग्रेस फोडण्यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मिरजेतील निकटवर्तीय यांचा हात असल्याचेही ते म्हणाले.पाटील म्हणाले, वसंतदादा बँक अपहारप्रकरणी बँकेच्या २७ माजी संचालक आणि मयत संचालकाचे ११ वारसदार, दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल आहे. १०१ मालमत्तांवर सरकारने टाच आणली होती. त्या मालमत्ता जप्तीचे आदेशही दिले होते. मात्र, भाजपने ही फाइल कटकारस्थान करण्यासाठी राखून ठेवली होती. या चौकशीला तत्कालीन भाजप सरकारने २०१८ साली स्थगिती दिली. आता डाव साधून २०२२ साली प्रकरणाची फेरचौकशी लावली.चार वर्षे शांत झालेले चौकशीचे भूत पुन्हा एकदा मानगुटीवर बसवले. २०२१ ला फोडाफोडी करून राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर ही फाइल पुन्हा उघडली. या प्रकरणात भाजपने बारकाईने कट शिजवला. ईडी, सीबीआय, जेल, लिलाव अशा धमक्या दिल्या गेल्या. निवडणुकीची तयारी नसताना त्यांनी उमेदवारीसाठी दावा केला. विधान परिषदेचे सदस्यत्व नाकारले. हे का झाले? यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या मिरजेतील निकटवर्तीयाने या बंडाचे डील केले. आता हे धर्मसंकट असल्याचे सांगून कृपया मतदारांची दिशाभूल करू नये. हे धर्मसंकट नसून भाजपचा कट आहे. त्यांच्या भोवतीच्या बडव्यांनी काँग्रेससोबत केलेली गद्दारी आहे.

बडव्यांनी बंड उभा केलेबहुजन समाज या चक्रव्यूहात अडकणार नाही, कारण आमदार सुधीर गाडगीळ यांनी मैदानातून काढलेला पळ हा वसंतदादा बँकेच्या आडून केलेला कट फसत असल्याने होता. अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्याने स्वतः लक्ष घालून या प्रकरणात दबावतंत्र वापरले आणि बडव्यांनी बंड उभा केले. डॉ. विश्वजीत कदम यांना या बडव्यांचा डाव कळालेला आहे, म्हणूनच त्यांनी वहिनींना फितवणाऱ्यांची खैर नाही, असा इशारा दिला आहे, असेही पाटील म्हणाले.

ठेवीदारांच्या मुलांची शिक्षणे थांबलीपृथ्वीराज पाटील म्हणाले, वसंतदादा बँकेत अपहारामुळे दहा हजारांहून अधिक ठेवीदार कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. ठेवीदारांच्या मुलाबाळांना उपाशी राहावे लागले. मुलीच्या लग्नाला पैसे मिळाले नाहीत, मुलांची शिक्षणे थांबली. ज्येष्ठ नागरिकांना औषधाला, उपचाराला पैसे मिळाले नाहीत. लोकांना हे माहिती आहे. लोक शहाणे आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीcongressकाँग्रेसBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024