शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

मतदारांनो, महायुतीच्या गद्दारांना धडा शिकवा; तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:49 IST

..ही ''भारतीय झूठ पार्टी''

कडेगाव : महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अशी महाराष्ट्राची ओळख देशात आणि जगात आहे. नेमके हेच मोदी सरकारला मान्य नाही. म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस फोडली. महाविकास आघाडीतून फुटून गेलेल्या गद्दारांना मतदारांनी या निवडणुकीत धडा शिकवावा आणि महाविकास आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केले.महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ पलूस व कडेगाव येथे रेवंत रेड्डी यांची सोमवारी सभा झाली. यावेळी ते बोलत होते. खासदार विशाल पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, युवा नेते डॉ. जितेश कदम, शिवसेनेचे सुभाष मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. ही लढाई आपण दोन गुजराती सोबत लढत आहोत. हे अदानी प्रणीत डबल इंजिन सरकार आहे. अदानीसोबत घेऊन मोदी सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांची लूट करीत आहेत. उद्धव ठाकरे सोबत उपमुख्यमंत्री होण्यासाठी देवेंद्र फडणवीस तयार नव्हते. मग तुम्ही एकनाथ शिंदे सोबत उपमुख्यमंत्री कसे झाले. आपण पाच वर्षे मुख्यमंत्री होता. तरीसुद्धा पुन्हा उपमुख्यमंत्री होण्याची काय आवश्यकता होती, असा सवाल रेड्डी यांनी उपस्थित केला.

..ही ''भारतीय झूठ पार्टी''पंतप्रधान यांच्या आदेशावरून महाराष्ट्रातील मोठे १७ उद्योग आणि कारखाने गुजरातमध्ये हलवले गेले. हे महाराष्ट्राच्या विकासावर प्रहार करणारे आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील नेते गुजरातचे गुलाम झाले आहेत. मग, महाराष्ट्र राज्याचा विकास कसा होईल, असा सवाल रेड्डी यांनी केला. मोदी सरकारने दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचा दावा केला होता. पण, प्रत्यक्षात बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ही भारतीय जनता पार्टी नसून, ''भारतीय झूठ पार्टी'' आहे, असा दावा रेड्डी यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४palus-kadegaon-acपलूस कडेगावVishwajeet Kadamविश्वजीत कदमMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024