शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

Maharashtra Assembly Election 2019 :तासगावात आमदार, कवठेमहांकाळला सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 3:18 PM

आता नाही, तर कधीच नाही, याच भूमिकेतून तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी तयारी चालविली आहे. निवडणुकीचा कानोसा घेण्यासाठी मतदारसंघातील गावांना थेट भेट दिली.

ठळक मुद्देMaharashtra Assembly Election 2019 :तासगावात आमदार, कवठेमहांकाळला सरकारतासगाव-कवठेमहांकळ मतदारसंघातील गावांना थेट भेट

दत्त पाटीलकवठेमहांकाळ  -आता नाही, तर कधीच नाही, याच भूमिकेतून तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी तयारी चालविली आहे. निवडणुकीचा कानोसा घेण्यासाठी मतदारसंघातील गावांना थेट भेट दिली.तासगाव तालुक्यात आमदार सुमनताई पाटील यांची, तर कवठेमहांकाळ तालुक्यात अजितराव घोरपडे सरकारांची हवा असल्याचे दिसून नेते. वर्षानुवर्षांचा पाणीप्रश्न आणि नेत्यांचा जनसंपर्क, हाच कळीचा मुद्दा ठरणार असल्याचे चित्र मतदारसंघात आहे. राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांच्या पश्चात पहिल्यांदाच आबा गट विरोधकांशी दोन हात करत स्वत:ची ताकद अजमावत आहे.कदाचित ही निवडणूक सुमनतार्इंसाठी शेवटची ठरणारी असली तरी, युवा नेते रोहित पाटील यांचा राजकीय पाया निश्चित करणारी ठरणार आहे. अखेरच्याक्षणी भाजपला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री अजितराव घोरपडे शिवसेनेकडून रिंगणात उतरले. राजकीय मर्यादा असल्याने भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यावर भिस्त ठेवून त्यांनी शड्डू ठोकला.तासगाव तालुक्यातील बहुतांश गावात आमदार सुमनतार्इंची हवा असल्याचे दिसून आले. पाच वर्षात आमदार सुमनतार्इंकडून झालेली विकासकामे आणि जनसंपर्क यामुळे यंदा त्याच असल्याचे मतदारांकडून सांगितले जात आहे. यंदा आमच्याकडं आबाचंच वारं दिसतंय. घोरपडे सरकार इकडं कधी फिरकलं नाहीत. त्यामुळं इकडं ते जास्त चालणार न्हाईत. असं सिध्देवाडीचे आण्णू पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, सिध्देवाडीचा मोठा तलाव हाय, पर पाणी न्हवतं. पाण्यासाठी खासदारास्नी मतं दिली. पण कुणीच पाणी दिलं न्हाय. शेवटी निसर्गानंच तलाव भरून दिलाय. आमदार सत्तेत न्हायीत, पर ज्यांच्या हातात सत्ता हाय त्यांनी बी पाणी दिलं न्हाय.तासगाव तालुक्यातून कवठेमहांकाळ तालुक्यात घाटनांद्रेत प्रवेश केला. गावातच पारावर काही मंडळींची बैठक बसली होती. टेंभूच्या पाईप लोकसभा निवडणुकीआधी येऊन पडल्यात. मात्र पाण्याचा प्रश्न मिटला नाही. गावात प्रचाराच्या गाड्या येतात, पण उमेदवार आले नसल्याचेही काहींनी सांगितले.

कुणीबी आलं तरी पाणी काय मिळत न्हायह्ण अशा मानसिकतेतून निरुत्साह असल्याचे चित्र दिसून आले. सरकार जास्त फिरकलं नाहीत, आमदारबी आल्या नाहीत. पण आबानं केलेल्या कामाच्या जोरावर आबा गटच जास्त चालंल असं पतंगराव शिंदे यांनी सांगितले.सरकार आलं तर पाणी यील, अशी प्रतिक्रिया कुंडलापूरच्या उदय पाटील यांनी दिली. कवठेमहांकाळजवळ वाटेतच शिंदेवाडीचे सरपंच भेटले. यंदा सरकारांना निवडून आणायचंच, यासाठी आम्ही तासगाव तालुका पिंजून काढला आहे. मणेराजुरीत ठाण मांडले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.तासगाव तालुक्यात आमदार सुमनताई पाटील यांचा जनसंपर्क, कवठेमहांकाळ तालुक्यात आर. आर. पाटील यांनी केलेली विकासकामे आणि रोहित पाटील यांचा प्रभाव, या भरोशावर राष्टÑवादीला मतदान करणार असल्याचा सूर आहे.

दुसरीकडे खासदार आणि सरकार मिळून मतदारसंघाचा कायापालट करतील. सरकारांची आमदारकी हा कवठेमहांकाळच्या अस्मितेचा विषय आहे. या मुद्द्यावर घोरपडेंना मतदान करण्याचा सूर आहे.

टॅग्स :tasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळAjitrao Ghorpadeअजितराव घोरपडेSangliसांगली