शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान दोनशे कोटीवर, मागितले केवळ ५४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST

सांगली : महापुरात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यातील २४७ गावांतील ३९ हजार ६९५ क्षेत्रातील सोयाबीन, ज्वारी, मका, भात, ...

सांगली : महापुरात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यातील २४७ गावांतील ३९ हजार ६९५ क्षेत्रातील सोयाबीन, ज्वारी, मका, भात, भाजीपाला आणि फळपिके जमीनदोस्त झाली आहेत. एक लाख १२०९ शेतकऱ्यांच्या शेतातील हातातोंडाला आलेली पिके वाया गेली. प्रशासनाने पंचनामे करून ५४ कोटींच्या निधीची शासनाकडे मागणी केली असली तरी प्रत्यक्षात हे नुकसान दोनशे कोटींवर असल्याचा अंदाज आहे.

जुलैत झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे पाच तालुक्यांतील २४७ गावांमधील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मिरज तालुक्यातील २६ गावे बाधित झाली असून, २१ हजार ५०३ शेतकऱ्यांचे नऊ हजार ३९८ हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. वाळवा तालुक्यातील ९८ गावांना पुराचा तडाखा बसला असून, ४३ हजार दोन शेतकऱ्यांचे १४ हजार ३१३ हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. शिराळा तालुक्यातील ९५ गावांतील २१ हजार ८९० शेतकऱ्यांचे चार हजार ७५८ हेक्टरचे नुकसान झाले असून, पंचनामेही पूर्ण आहेत. पलूस तालुक्यातील २६ गावांतील १३ हजार ५४१ शेतकऱ्यांचे सात हजार ९१८ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामेही पूर्ण केले आहेत. तासगाव तालुक्यातील दोन गावांमधील ७३ शेतकऱ्यांचे ३१.९२ हेक्टर नुकसानीचे पंचनामे पूर्ण आहेत. प्रशासनाने पंचनामे पूर्ण करून ३९ हजार ६९५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, तेथील शेतकऱ्यांना भरपाईसाठी शासनाकडे ५४ कोटी २८ लाख रुपयांची मागणी केली आहे.

प्रशासनाने पंचनामे करून तुटपुंज्या निधीची मागणी केली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे दोनशे कोटींहून अधिकचे नुकसान झाल्याचे पूरग्रस्त आणि कृषितज्ज्ञांचे मत आहे.

चौकट

पुरामुळे ४५५ हेक्टरवरील माती गेली वाहून

महापुरामुळे जमीन खरडून गेलेल्या १८१ गावांतील सहा हजार ३४२ शेतकऱ्यांच्या ४५५ हेक्टर क्षेत्रातील पिकांबरोबरच मातीही वाहून गेल्यामुळे ती जमीन नापिक झाली आहे. या शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

कोट

पंचनामे पूर्ण झाले असून, शासनाकडे निधीची मागणी केली आहे. शासनाकडून निधी मिळताच शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.

-मोसमी बर्डे, निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली

चौकट

पुरामुळे पिकांचे नुकसान

तालुका शेतकरी क्षेत्र हेक्टरमध्ये अपेक्षित निधी

मिरज २१,९२३ १२,६७२.९१ १६.९० कोटी

वाळवा ४३,००२ १४,३१३.८६ १९.३६ कोटी

शिराळा २१,८९० ४५५८.१३ ३.६३ कोटी

पलूस १३,५४१ ७९१८.८७ १०.७९ कोटी

तासगाव ७३ ३१.९२ ३.२४ लाख

एकूण १०,१२०९ ३९,६९५.६९ ५४ कोटी २८ हजार

———————-