शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

'भाजपच्या सुजाण नगरसेवकांमुळे महापालिकेत आघाडीची सत्ता'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 1:46 PM

प्रभाग १६ ची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. पण भाजपमुळेच त्याला खो बसल्याचा आरोपही केला.

सांगली : महापालिका क्षेत्रातील जनतेने भाजपला बहुमताने सत्ता दिली, पण त्यांची सत्ता जनतेच्या उपयोगी नव्हती. त्यामुळेच काँग्रेस व भाजपमधील सुजाण नगरसेवकांमुळे आघाडीची सत्ता आली, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केले. प्रभाग १६ ची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. पण भाजपमुळेच त्याला खो बसल्याचा आरोपही केला.

महापालिकेच्या प्रभाग १६ मधील पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार तौफिक शिकलगार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान, राहुल पवार, शेखर माने, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक मयूर पाटील उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, हारुण शिकलगार यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली. मदनभाऊ पाटील यांनाही कायम साथ दिली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. पण सतत राजकीय विचार करणाऱ्यांमुळे बिनविरोध झाली नाही.

महापालिकेत आघाडीची सत्ता आल्यापासून नवे उपक्रम राबविले जात आहेत. रस्ते, रुग्णालयांच्या सुधारणा होत आहेत. तौफिक याच्यारूपाने तरुण कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्याच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही कार्यरत आहेत. काँग्रेसमुळेच राष्ट्रवादीचा महापौर झाला, हे विसरता येणार नाही. या प्रभागाच्या विकासासाठी सर्व नेते, महापौर लक्ष देतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जातीयवादी शक्ती रोखा

विश्वजित कदम म्हणाले की, हारूण शिकलगार यांनी २५ वर्षे वाॅर्डाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडविल्या. त्यांच्या अकाली निधनानंतर तौफिकला काम करण्याची संधी द्या. ही निवडणूक जातीयवादी शक्ती रोखण्यासाठी महत्त्वाची आहे. काहीजण निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला बळी पडू नका, असे आवाहनही केले.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपा