शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

कृष्णा नदी प्रदूषण: दत्त इंडिया, स्वप्नपूर्तीला कारखाना बंद करण्याचे आदेश, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 18:52 IST

पाटबंधारेला पाण्याचा तर महावितरणला वीजपुरवठा बंद करण्याची सूचनाही दिली

सांगली : कृष्णा नदीच्याप्रदूषणप्रश्नी गंभीर दखल घेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी वसंतदादा साखर कारखाना चालविणाऱ्या दत्त इंडिया कंपनीसह डिस्टलरी चालविणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सला कारखाना बंद करण्याचे आदेश दिले. पाटबंधारेला पाण्याचा तर महावितरणला वीजपुरवठा बंद करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.चार दिवसांपूर्वी कृष्णा नदीत अंकलीजवळ मासे मृत झाले. यावरून संतप्त झालेल्या सामाजिक संघटनांनी आंदोलने केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी प्रदूषणाचा स्रोत शोधून काढत दत्त इंडिया कंपनीला नोटीस बजावली होती. घटनास्थळाचा पंचनामा करून त्याबाबतचा एक अहवालही उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी नवनाथ औताडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला पाठविला होता. त्याची दखल घेत, दोन्ही कंपन्यांना सोमवारी नोटीस बजावण्यात आली.मंडळाने दोन्ही कंपन्यांना नदीच्या प्रदूषणास व मासे मृत होण्यास जबाबदार धरले आहे. नोटिशीत त्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सध्या श्री दत्त इंडिया कंपनी चालवित आहे, तर कारखान्याची डिस्टलरी स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेड ही कंपनी चालवित आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांनी तातडीने कारखाने बंद करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.कंपन्यांना नोटिसा बजावतानाच मंडळाने महावितरण कंपनी व पाटबंधारे विभागाला वीज व पाणीपुरवठा तोडण्याची सूचना दिली आहे. तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे. सोमवारी पत्रे प्राप्त झाल्याने मंगळवारी वीज व पाणीपुरवठा तोडला जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेविरोधातही कारवाईच्या हालचालीमहापालिकेस यापूर्वीच फौजदारी कारवाईची नोटीस मंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी बजावली आहे. त्यावर महापालिकेने अद्याप खुलासा केलेला नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मंडळामार्फत महापालिकेवरही मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

‘दत्त इंडिया’कडून प्रतिसाद नाहीदत्त इंडिया कंपनीच्या उपाध्यक्षांना याप्रश्नी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कंपनीची भूमिका समजू शकली नाही. शेवटच्या टप्प्यात कारखाना बंद झाल्यास कंपनीच्या, तसेच ऊस तोडणी करून गाळपाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेriverनदीpollutionप्रदूषण