शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

कृष्णा नदी प्रदूषण: दत्त इंडिया, स्वप्नपूर्तीला कारखाना बंद करण्याचे आदेश, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 18:52 IST

पाटबंधारेला पाण्याचा तर महावितरणला वीजपुरवठा बंद करण्याची सूचनाही दिली

सांगली : कृष्णा नदीच्याप्रदूषणप्रश्नी गंभीर दखल घेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी वसंतदादा साखर कारखाना चालविणाऱ्या दत्त इंडिया कंपनीसह डिस्टलरी चालविणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सला कारखाना बंद करण्याचे आदेश दिले. पाटबंधारेला पाण्याचा तर महावितरणला वीजपुरवठा बंद करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.चार दिवसांपूर्वी कृष्णा नदीत अंकलीजवळ मासे मृत झाले. यावरून संतप्त झालेल्या सामाजिक संघटनांनी आंदोलने केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी प्रदूषणाचा स्रोत शोधून काढत दत्त इंडिया कंपनीला नोटीस बजावली होती. घटनास्थळाचा पंचनामा करून त्याबाबतचा एक अहवालही उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी नवनाथ औताडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला पाठविला होता. त्याची दखल घेत, दोन्ही कंपन्यांना सोमवारी नोटीस बजावण्यात आली.मंडळाने दोन्ही कंपन्यांना नदीच्या प्रदूषणास व मासे मृत होण्यास जबाबदार धरले आहे. नोटिशीत त्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सध्या श्री दत्त इंडिया कंपनी चालवित आहे, तर कारखान्याची डिस्टलरी स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेड ही कंपनी चालवित आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांनी तातडीने कारखाने बंद करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.कंपन्यांना नोटिसा बजावतानाच मंडळाने महावितरण कंपनी व पाटबंधारे विभागाला वीज व पाणीपुरवठा तोडण्याची सूचना दिली आहे. तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे. सोमवारी पत्रे प्राप्त झाल्याने मंगळवारी वीज व पाणीपुरवठा तोडला जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेविरोधातही कारवाईच्या हालचालीमहापालिकेस यापूर्वीच फौजदारी कारवाईची नोटीस मंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी बजावली आहे. त्यावर महापालिकेने अद्याप खुलासा केलेला नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मंडळामार्फत महापालिकेवरही मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

‘दत्त इंडिया’कडून प्रतिसाद नाहीदत्त इंडिया कंपनीच्या उपाध्यक्षांना याप्रश्नी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कंपनीची भूमिका समजू शकली नाही. शेवटच्या टप्प्यात कारखाना बंद झाल्यास कंपनीच्या, तसेच ऊस तोडणी करून गाळपाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेriverनदीpollutionप्रदूषण