शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
3
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
4
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
5
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
6
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
7
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
8
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
10
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
11
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
12
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
13
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
14
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
15
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
16
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
17
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
18
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
19
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
20
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा

कोयना, वारणा धरण व्यवस्थापनाचे पाणी साठ्याकडे दुर्लक्ष, महापूर विरोधी कृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:14 IST

पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती

सांगली : कोयना, राधानगरी, चांदोली या धरणामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. कृष्णा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. धरणातीलपाणीसाठ्याबाबत केंद्रीय जल आयोगाने नियमावली केली आहे. या नियमाचा एकाही धरण व्यवस्थापनाने अंमलबजावणी केली नाही. कोयना आणि वारणा धरण व्यवस्थापनाला केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार जुलैपर्यंत ५० टक्केच पाणीसाठा ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना द्यावी, अशी मागणी महापूर विरोधी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवारी केली.महापूर विरोधी कृती समितीतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले की, सद्य:स्थितीत सर्वत्र पाऊस सुरू आहे. सांगली शहर, कृष्णाकाठचा सर्व परिसर हा कृष्णा नदीच्या पूरपात्रात येतो. महापुराचे गंभीर सावट यावर्षी जाणवत आहे. आतापर्यंत आलेल्या पुराचे कारण म्हणजे कोयना धरणातील पाणीसाठा हा क्षमतेपेक्षा जास्त ठेवल्याचे आहे. दि. १५ जुलै रोजी केंद्रीय जल आयोगाच्या नियमांचा कोयना धरण व्यवस्थापनाने भंग केलेला आहे. जुलै २०२५ पर्यंत केंद्रीय जल आयोगाच्या तत्त्वाने सर्व धरणांसाठी ५० टक्के इतकाच पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे.सध्या कोयना, राधानगरी, वारणा धरणामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा ठेवला आहे. येत्या काही दिवसात पाऊस वाढल्यास कोयना धरणातून व्यवस्थापनास प्रति सेकंद एक लाख क्युसेकपर्यंत विसर्ग करावा लागेल. त्यामुळे सर्वत्र कृष्णा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण होईल. जिल्हाधिकारी यांनी पाटबंधारे विभागाला धरण पाणीपातळी तातडीने केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे जुलैला ५० टक्केपर्यंतच पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. त्यानुसार आतापासूनच धरणातून विसर्ग वाढवावा. यामुळे भविष्यात होणारी वित्त व जीवित हानी टाळणे शक्य आहे.यावेळी कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, महापूर विरोधी कृती समितीचे मनोज साळुंखे, रणजित जाधव, संतोष कोळेकर, राहुल चौगुले, संदीप खोत, रुस्तुम पटेल, सुभाष कोळेकर, रोहित चौगुले आदी उपस्थित होते.

केंद्रीय जल आयोगाकडेही तक्रार : सर्जेराव पाटीलपश्चिम महाराष्ट्रातील धरणामध्ये ७५ टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा जुलैमध्येच ठेवला आहे. या पाणीसाठ्यामुळे भविष्यात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून केंद्रीय जल आयोगाने तातडीने सर्वच धरण व्यवस्थापन विभागाला पाणीसाठा नियमानुसार ठेवण्याची सूचना द्यावी, अशा मागणीचे पत्र केंद्रीय जल आयोगाकडे पाठविले आहे, असेही कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी सांगितले.