शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-मुंबई मार्गावर २४ सप्टेंबरपासून जादा रेल्वे धावणार, कधी अन् किती वाजता सुटणार.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 17:41 IST

दादर - म्हैसूर २० मिनिटे अगोदर सुटणार

सांगली : कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर ही साप्ताहिक विशेष एक्सप्रेस रेल्वे २४ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. या काळात तिच्या जाता-येता २० फेऱ्या होतील.गाडी क्रमांक ०१४१८ ही कोल्हापूर - मुंबई साप्ताहिक विशेष गाडी दर बुधवारी कोल्हापुरातून रात्री १० वाजता निघेल. सांगलीरेल्वे स्थानकात रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी येईल. दुसऱ्या दिवशी दुपारी १:३० वाजता मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४१७ ही मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कोल्हापूर साप्ताहिक विशेष गाडी दर गुरुवारी दुपारी २:३० वाजता निघेल. सांगलीत रात्री १ वाजता पोहोचेल. कोल्हापुरात पहाटे ४:२० वाजता जाईल. या एक्सप्रेसला मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, लोणंद, जेजुरी, पुणे, लोणावळा, कल्याण हे थांबे आहेत. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ तृतीय श्रेणी वातानुकूलित, १० स्लीपर, ४ सामान्य, २ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील. नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी या गाडीसाठी पाठपुरावा केला होता.

दादर - म्हैसूर २० मिनिटे अगोदर सुटणारदादर - म्हैसूर- तिरूनेलवल्ली- पुद्दुचेरी ही गाडी मिरज जंक्शनमधून सकाळी ६:५० ऐवजी सकाळी ६:३० वाजता सुटेल. अजमेर - बंगळुरू, जोधपूर - बंगळुरू, गांधीधाम - बंगळुरू ही एक्सप्रेस मिरजमधून सकाळी ७:४५ ऐवजी सकाळी ७:२५ वाजता सुटेल. शनिवारपासून (दि. १३) हा बदल अमलात येणार आहे. रेल्वेच्या वेळापत्रकातील बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे कृती समितीचे मकरंद देशपांडे, सुकुमार पाटील यांनी केले आहे.