शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

सोलापूरातून कोल्हापूर, मिरज एक्सप्रेस १ सप्टेंबरपासून धावण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 12:48 IST

Railway Sangli : सोलापूर-कोल्हापूर व सोलापूर- मिरज या प्रदीर्घ काळ बंद असलेल्या एक्सप्रेस १ सप्टेंबरपासून पुन्हा धावण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्याच्या काही एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सोलापूर विभागाकडून सुरु आहेत.

ठळक मुद्देसोलापूरातून कोल्हापूर, मिरज एक्सप्रेस १ सप्टेंबरपासून धावण्याची शक्यतापंढरपूर पॅसेंजर तूर्त नाहीच

सांगली : सोलापूर-कोल्हापूरसोलापूर- मिरज या प्रदीर्घ काळ बंद असलेल्या एक्सप्रेस १ सप्टेंबरपासून पुन्हा धावण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्याच्या काही एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सोलापूर विभागाकडून सुरु आहेत.सोलापूर विभागाच्या सोलापूर-कोल्हापूर व कोल्हापूर-सोलापूर या एक्सप्रेस दररोज रात्री ११ वाजता सोलापूर व कोल्हापुरातून सुटतात. तर सोलापूर -मिरज एक्सप्रेस सकाळी सात वाजता सोलापुरातून आणि संध्याकाळी साडेचार वाजता मिरजेतून सुटते. लॉकडाऊन काळात त्या थांबविण्यात आल्या होत्या. अनलॉक काळात काही आरक्षित प्रवासाच्या गाड्या पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सोलापूर विभागात सुरु आहेत.

या गाड्यांमध्ये जनरल श्रेणीचा प्रवास करता येणार नाही, फक्त आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवेश मिळेल. सोलापूरचे विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी याला दुजोरा दिला. १ सप्टेंबरपासून काही आरक्षित गाड्या सुरु केल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.

प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की, यामुळे कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील हजारो प्रवाशांची सोय होणार आहे. कोरोनाविषयक खबरदारी घेऊन प्रवासाला मुभा मिळेल. दीड वर्षांपासून गाड्या बंद असल्याने प्रवाशांची कुचंबणा झाली आहे.पंढरपूर पॅसेंजर तूर्त नाहीचदरम्यान, मिरज ते पंढरपूर मार्गावरील पॅसेंजर गाड्या सुरु होण्याची चिन्हे मात्र नाहीत. संपूर्ण अनलॉकनंतरच टप्प्याटप्प्याने त्या सुरु होतील.

टॅग्स :railwayरेल्वेSangliसांगलीSolapurसोलापूरkolhapurकोल्हापूर