शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

महाराष्ट्रातला रोजगार गुजरातला पळविला जातोय, विश्वजित कदमांचे भाजप सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 16:12 IST

काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा सांगलीत समारोप

सांगली : केंद्रातील भाजप सरकार रोजगार देण्याची स्वप्ने रंगवून महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून नेत आहे. लाखो तरुणांचे रोजगार हिरावून घेण्याचे पाप सरकार करत आहे, अशी टीका माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले.सांगलीत गुरुवारी रात्री काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेच्या सांगतेप्रसंगी हिराबाग कॉर्नरला झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शैलजा पाटील, डॉ. जितेश कदम आदी उपस्थित होते.डॉ. कदम म्हणाले, महिलांवर अत्याचार वाढले आहेत. देशाची न्याययंत्रणा अद्याप सुस्थितीत असल्याने राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळाली. आता पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्याने झोपलेल्या सरकारला जग येत आहे. निवडणुका जवळ आल्याने आता सरकारला लोकांची आठवण येत आहे. गॅस सिलिंडरचे दर कमी केले आहेत.पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगलीचे प्रश्न विधानसभेत आजवर ताकदीने मांडले गेले नाहीत. रस्ते, सांडपाणी, शेरीनाला हे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. आम्ही विश्वजित कदम यांच्याकडे शासकीय रुग्णालयाचा प्रस्ताव दिल्यानंतर तातडीने ५०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले. तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी २३२ कोटी रुपये मंजूर केले. आम्ही जिल्ह्याचे नेतृत्व विश्वजित कदम यांच्याकडे सोपविले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकात आमदारकी व खासदारकी काँग्रेसकडे राहील याचा विश्वास आहे.यावेळी जितेश कदम, जयश्रीताई पाटील, यांनीही भूमिका मांडली. सभेला सुभाष खोत, मालन मोहिते, बिपीन कदम, मनोज सरगर, अभिजित भोसले, ॲड. भाऊसाहेब पाटील, करीम मेस्त्री, आशिष कोरी, मंगेश चव्हाण, सिकंदर जामदार, अजित ढोले हेदेखील उपस्थित होते.

सरकारची पाकीटमारीविश्वजित कदम म्हणाले, ७५० रुपयांचे सिलिंडर १२०० करून आता २०० रुपये कमी केले. पण, आमचे हजार रुपये जाताहेत त्याचे काय? ही तर सरकारची पाकीटमारीच आहे. केवळ लोकांना भुलवायचे काम सध्या सुरू आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदमBJPभाजपाGujaratगुजरात