शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Jayant Patil: जयंतरावांचे नवे डाव, नवे दावे, सांगलीतून... विधानसभा की लोकसभा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 18:29 IST

जयंतरावांनी दोन-तीन वर्षांपासून थोरल्या मुलाला राजकीय वारसदार म्हणून पुढं आणलंय. प्रतीक यांच्यासाठी स्वत:चा इस्लामपूर मतदारसंघ द्यायची त्यांची तयारी असेलच, पण स्वत:साठी मात्र अजून ते अंदाज घेताहेत.

श्रीनिवास नागे

स्वत:चा सुरक्षित मतदारसंघ मुलाला द्यायचा आणि आपण स्वत: शेजारच्या सांगली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवायची, याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील अंदाज घेताहेत. त्यांची सावध पावलं जतकडून सांगली शहराकडं वळलीत. मात्र त्यांनी लोकसभाच लढवली, तर सहज मैदान मारता येईल, असंही सांगितलं जातंय.

जयंतरावांनी दोन-तीन वर्षांपासून थोरल्या मुलाला राजकीय वारसदार म्हणून पुढं आणलंय. प्रतीक यांच्यासाठी स्वत:चा इस्लामपूर मतदारसंघ द्यायची त्यांची तयारी असेलच, पण स्वत:साठी मात्र अजून ते अंदाज घेताहेत. सुरुवातीला त्यांची नजर जत मतदारसंघावर होती. त्यासाठी त्यांनी भाजपमध्ये गेलेले बडे मोहरे आपल्याकडं वळवले. तिथं वडील दिवंगत राजाराम बापूंचे बक्कळ अनुयायी. शिवाय विरोधी भाजपची धार बोथट झालेली. जतचा बंद पडलेला डफळे साखर कारखाना जयंतरावांच्या कारखान्यानं चालवण्यास घेतलेला.

जलसंपदा विभागाकडून पूर्व भागातल्या गावांना म्हैसाळच्या विस्तारित योजनेतून सातशे कोटी खर्चून पाणी देण्याची तयारी चालवलेली. सगळं अनुकूल वाटत होतं. पण, काँग्रेसचा अडसर दिसू लागला. तिथले आमदार विक्रम सावंत काँग्रेसचे. ते कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मावसभाऊ. विधानसभेच्या निवडणुकीत महाआघाडी झाली तर मतदारसंघ काँग्रेस सोडणार नाही. तो तर कदम यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न. त्यामुळं जयंतराव जतबाबत तूर्त थांबले असावेत.

शिराळ्याचाही पर्याय चाचपण्यात आला. तिथं मानसिंगराव नाईक राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांना जिल्हा बँकेचं अध्यक्षपद दिलंय. अलीकडंच कट्टर विरोधक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांना भाजपमधून राष्ट्रवादीच्या तंबूत घेतलंय. शिराळा मतदारसंघात वाळव्यातली ४८ गावं आहेत. पण तिथं महाडिक गटाचा जोरदार विरोध होऊ शकतो. शिवाय जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार वाढवायचे असतील तर शिराळ्यापेक्षा दुसरा मतदारसंघ पहावा, यातून सांगलीचा पर्याय पुढं आला.

सांगली मतदारसंघात सन १९८६ पासून आतापर्यंत केवळ एकदाच काँग्रेसनं आणि एकदा अपक्ष असलेल्या मदन पाटलांनी बाजी मारलेली. काँग्रेसनं सातत्यानं हाराकिरी पत्करल्यामुळं आता राष्ट्रवादी या जागेवर दावा करू शकते. काँग्रेसमध्ये गटबाजी जादा, त्यामुळं तिकिटासाठी साठमारी ठरलेलीच. विधानसभेवेळी महाआघाडी झाली तर राष्ट्रवादीचा दावा आणि नवा चेहरा पुढं करता येईल, जागावाटपही ‘मॅनेज’ करता येईल, अशी अटकळ जयंतरावांनी बांधली असावी.

मुख्यमंत्री होण्याची जयंतरावांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. ते जाहीरपणानं सांगत नाहीत इतकंच! पण तिथं अजित पवारांसारखा खमक्या अडसर आहे. पक्षातलं वजन वाढलं पाहिजे, स्वत:च्या आमदारांची संख्या नजरेत भरली पाहिजे, हे त्यांना पक्कं ठाऊक आहे. त्यामुळं जिल्ह्यात काँग्रेस-भाजपला दाबत आपली ताकद वाढवण्यासाठी ते नवा आमदार देतीलही.. अर्थात तो डावही हुकायला लागला तर खासदार तरी आपल्या पक्षाचा हवा, हेही त्यांचं लक्ष्य असेल. हा खासदार त्यांच्या घरातला असेल, किंवा ते स्वत:च असतील! त्यांना स्वत:ला खासदारकीत काडीचाही रस नाही, परंतु भविष्यात सारीपाटावरच्या सोंगट्याच तशा हलल्या तर..?

सांगली शहरात सातत्यानं ‘कार्यक्रम’

भाजपच्या ताब्यातली महापालिका मुठीत घेतल्यानंतर जयंतराव सातत्यानं सांगलीत सार्वजनिक आणि राजकीय ‘कार्यक्रम’ करताहेत. २००८ मध्ये त्यांनी महापालिकेत महाआघाडीचा डाव यशस्वी केला होता. तशीच जुळवाजुळव सुरू आहे. मतदारांना प्रभावित करण्यासाठी चकचकीत रस्त्यांपासून उद्यानं, मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांपर्यंतचे घाट घातले जाताहेत.

काँग्रेस आणि भाजपलाही चुचकारलं!

सांगली शहरात राष्ट्रवादीतल्या कुरबुरीवर जयंतरावांनी मात्रा शोधलीय. कुणी काय करायचं, हेच आखून-रेखून दिलंय. काँग्रेसमधील मदनभाऊ गटाला वळवलंय, तर विश्वजित कदम गट मात्र अंतर राखून आहे. विशाल पाटील गट विरोधात असणार, हे स्वाभाविकच. जयंतरावांनी भाजपलाही चुचकारलंय. २००८ मधल्या महाआघाडीतले मोहरे हाती लागतील, अशी त्यांची खात्री आहे. नाही तरी जिल्ह्यातली भाजप त्यांचंच बोट धरून मोठी झालीय. ‘बीजेपी’ नव्हे ‘जेजेपी’ (जयंत पाटील पार्टी) असं खुद्द भाजपचे नेतेच म्हणत होते. तो पैरा आता फेडावा, अशी त्यांची अपेक्षा असणारच. मागच्या आठवड्यात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पुढील वेळी आपणच उभं राहणार, असं ठणकावून सांगितलं. भाजपमध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांसाठी तो इशारा तर नव्हता?

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलvidhan sabhaविधानसभाlok sabhaलोकसभा