शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

जयंत पाटलांना जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विसर, इस्लामपुरात दलबदलू नेत्यांनाच भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 13:24 IST

अलीकडील काळात पै-पाहुण्यांचे राजकारण फोफावले

अशोक पाटीलइस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांना पाठबळ देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता, अशा ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पाटील यांना विसर पडत चालला आहे. राजकारणातील बदलत्या समीकरणांतून दलबदलू कार्यकर्त्यांचा भाव वधारत चालला आहे, अशी खंत राष्ट्रवादीतील जुने कार्यकर्ते, माजी नगरसेवक शंकरराव पाटील यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.राजारामबापू यांच्या निधनानंतर विधानसभेचा इस्लामपूर मतदारसंघ आणि बापूंनी उभ्या केलेल्या सहकारी संस्था पोरक्या झाल्या. बहुतांशी कार्यकर्त्यांतून बापूंचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचे पुत्र जयंत पाटील यांचे नाव पुढे आले. काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. परंतु उरुण परिसरातील बहुतांशी बापूप्रेमी कार्यकर्त्यांनी जयंतरावांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी मी एक कार्यकर्ता होतो. परंतु जयंतरावांचा वाढता राजकीय आलेख पाहून इतर पक्षातील कार्यकर्त्यांची घुसखोरी झाली, याची खंत शंकरराव पाटील यांनी व्यक्त केली.

पाटील म्हणाले, राजारामबापू पाटील यांनी राज्याच्या सत्तेत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला. परंतु अलीकडील काळात आपला कोण, परका कोण, याचे आत्मपरीक्षणच केले जात नाही. ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे कार्यकर्त्यांचा ओघ, असे नवीन सूत्र राजकारणात आले आहे. त्यातच अलीकडील काळात पै-पाहुण्यांचे राजकारण फोफावले आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि निष्ठावान कार्यकर्ते जयंतरावांपासून दूर गेल्याचे दिसत असल्याचाही दावा काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यापैकी मी एक असून, आता राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून आजही जयंतरावांशी एकनिष्ठ आहे.भाडेकरू कार्यकर्त्यांची जमावाजमवइस्लामपूर मतदारसंघातील राजारामबापू उद्योग समूहात सामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मुलांना न्याय दिला गेला नाही. नोकरीची गरज नसतानाही पदाधिकाऱ्यांनी आपल्याच घरातील नव्या पिढीला नोकऱ्या दिल्या गेल्याने नेत्यांना आता भाडेकरू कार्यकर्त्यांची जमावाजमव करावी लागत आहे, असे शंकरराव पाटील म्हणाले

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील