शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुका दुष्काळी जाहीर करा

By admin | Updated: August 30, 2015 22:39 IST

‘स्वाभिमानी’ची मागणी : ४४ गावांतील शेतकरी आंदोलन उभारणार

संख : जत तालुका दुष्काळी जाहीर करावा, जनावरांसाठी प्रत्येक गावामध्ये चारा डेपो सुरू करावा व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जत पूर्व विभागप्रमुख चंद्रशेखर देबगोंड यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.जत तालुका कायमचा दुष्काळी तालुका आहे. निम्मा पावसाळा संपला तरीसुद्धा पावसाने दडी दिल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत ८० ते ८५ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. खरीप हंगामातील २९ टक्के पेरण्या झाल्या होत्या. पेरणीतील पिकेही पावसाअभावी जळून गेली आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगाम सलग तिसऱ्यावर्षी वाया गेला आहे.पाऊस झाला नसल्याने शेतकरी व कष्टकरी लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. आतापर्यंत सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतेला नाही. पिण्यासाठी पाणी नाही. शेतातील पिके गेल्याने व रानात खुरट्या गवताची उगवण झाली नसल्याने जनावरे कशी जगवायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील पिकेही गेलेली आहेत. द्राक्षे, डाळिंब, फळबागा अडचणीत सापडल्या आहेत. शेतकऱ्यांनी फळबागांवर बॅँक, सोसायटीची लाखो रुपयांची कर्जे काढलेली आहेत. त्याची परतफेड कशी करायची, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तालुका दुष्काळी जाहीर करावा, जनावरांसाठी प्रत्येक गावामध्ये चारा डेपो सुरू करावा व शेतकऱ्यांची सरसकट कर्जे माफ करावीत. अन्यथा पूर्व भागातील ४४ गावांतील शेतकऱ्यांनी आंदोलन न करता आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनावर राजू पुजारी, नागनाथ शिळीन, चंद्रशेखर देबगोंड आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)सलग तिसऱ्यावर्षी फटका आतापर्यंत ८० ते ८५ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. खरीप हंगामातील २९ टक्के पेरण्या झाल्या होत्या. पेरणीतील पिकेही पावसाअभावी जळून गेली आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगाम सलग तिसऱ्यावर्षी वाया गेला आहे.