शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

जत पश्चिममधील विहिरींनी गाठला तळ

By admin | Updated: November 17, 2014 23:23 IST

कूपनलिका वाढल्या : विहीर असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

डफळापूर : जत पश्चिम भागात सतत दुष्काळाशी सामना करीत शेतकऱ्यांनी पाण्याच्या शोधात मोठ्या संख्येने कूपनलिका खोदल्या असल्याने, शेकडो विहिरींतील पाण्याने तळ गाठला आहे. विहिरी मोठ्या प्रमाणात कोरड्या पडल्यामुळे त्या असून अडचण नसून खोळंबा बनल्या आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.सतत दुष्काळ पडत गेल्याने शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करण्याचा उद्देश डोळ्यासभोर ठेवून पाण्याच्या शोधात गेली वीस ते पंचवीस वर्षे झाली. कूपनलिका खोदण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर विजेची मागणीही वाढली. विजेच्या मोटारी आल्याने विहिरीवर मोट टाकणे शेतकऱ्यांनी बंद केले. विहिरीत व कूपनलिकेमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केल्यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठा कमी होत गेला. मोठ्या प्रमाणात कूपनलिका खोदल्या गेल्याने जमिनीची अक्षरश: चाळण झाली. ठिबक सिंचनचा म्हणावा तसा वापर न केल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडून वाया गेल्याने भूगर्भातील पाणीसाठा रिकामा होत गेला. पाण्याच्या शोधात शेतकऱ्यांनी चढाओढीने ५०० ते हजार, बाराशे फूट कूपनलिका खोदल्या. साठ ते सत्तर फूट खोल असणाऱ्या विहिरीतील पाण्याने तळ गाठला. विहिरी उपयोगाच्या ठरत नसल्याने विहिरी खोदण्याचे प्रमाण कमी झाले व कूपनलिका खोदणे शेतकऱ्यांनी पसंत केले. यापूर्वी विहिरी असणे, पाणी टिकून राहणे हे शेतकऱ्यांना विश्वासाचे वाटत असे. परंतु आता कूपनलिका खोदली असता, पाणी जरी मोठ्या प्रमाणात लागले तरी, हे पाणी टिकून राहील यावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. खोदलेल्या कूपनलिकांपैकी ८० टक्के कूपनलिका पाण्याअभावी निकामी झाल्या आहेत. कूपनलिका वाढत गेल्या, त्या प्रमाणात पाणाड्या व्यक्तींचेही प्रमाण वाढत गेले. पाणाड्यावर विश्वास ठेवून त्यांना मोबदला देऊन शेतकरी कूपनलिका खोदत आहेत. पण अंधश्रध्देपोटी पाणी न लागल्यामुळे हजारो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे. कूपनलिकांमुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली गेल्यामुळे पाण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे. कूपनलिका खोदणाऱ्यांनी मनमानी दर लावून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली आहे. पाण्याच्या शोधात जास्तीत जास्त खोलीवरून पाणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लागली असली तरी, शेतकऱ्यांनी हातच्या विहिरी निरुपयोगी करून ठेवल्या, ही शोकांतिका म्हणावी लागेल. (वार्ताहर)शेतकऱ्यांची पिळवणूकपाणाड्यावर विश्वास ठेवून त्यांना मोबदला देऊन शेतकरी कूपनलिका खोदत आहेत. पण अंधश्रध्देपोटी पाणी न लागल्यामुळे हजारो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे. कूपनलिकांमुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली गेल्यामुळे पाण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे. कूपनलिका खोदणाऱ्यांनी मनमानी दर लावून शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे.