शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

इंदिराजींच्या स्मृती अजूनही सांगलीकरांच्या हृदयात... इंदिरा गांधी जयंती विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:11 IST

श्रीनिवास नागे ।दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सांगलीचे ऋणानुबंध सत्तरच्या दशकात जुळले आणि अनेक वर्षे कायम राहिले. काँग्रेस पक्ष आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यामुळे इंदिराजींचे सांगलीशी दृढ बंध निर्माण झाले होते. इंदिराजींच्या जयंतीच्या निमित्ताने या आठवणींना दिलेला उजाळा...१९६९ मध्ये देशभर काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता. इंदिरा ...

ठळक मुद्देवसंतदादांचे संगठन कौशल्य पाहून इंदिरा गांधींनी त्यांना १९८० मध्ये केंद्रीय मंत्रिपदाची आॅफर दिली होतीवसंतदादांनी इंदिरा गांधींची भेट घेऊन राज्यातील नेतृत्व बदलण्याचे सुचविले.

श्रीनिवास नागे ।दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सांगलीचे ऋणानुबंध सत्तरच्या दशकात जुळले आणि अनेक वर्षे कायम राहिले. काँग्रेस पक्ष आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यामुळे इंदिराजींचे सांगलीशी दृढ बंध निर्माण झाले होते. इंदिराजींच्या जयंतीच्या निमित्ताने या आठवणींना दिलेला उजाळा...

१९६९ मध्ये देशभर काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता. इंदिरा गांधीपुरस्कृत इंडिकेट काँग्रेस आणि श्रेष्ठींची म्हणजे संघटना काँग्रेसची सिंडीकेट अशी फूट पडली. त्यावेळी वसंतदादा प्रदेशाध्यक्ष होते. १९७१ ला संघटना काँग्रेस, जनसंघ आणि संयुक्त समाजवादी पक्ष यांनी आघाडी तयार करून ‘इंदिरा हटाव’चा नारा दिला. त्यावेळी दादांनी इंदिरा गांधींच्या पाठीशी राहण्याची ठाम भूमिका घेतली. १९७२ मध्ये वसंतदादा प्रदेशाध्यक्ष असताना इंदिरा गांधींनीच त्यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी द्यावी, अशी सूचना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना केल्याने दादा पाटबंधारेमंत्री झाले.

पुढे आणीबाणीनंतर १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची वाताहत झाली. त्यावेळी वसंतदादांनी इंदिरा गांधींची भेट घेऊन राज्यातील नेतृत्व बदलण्याचे सुचविले. तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी पक्षांतर्गत निवडणूक झाली. त्यात दादा निवडून येऊन मुख्यमंत्री बनले. १९७८च्या दरम्यान काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडली. इंदिरा काँग्रेस आणि समाजवादी (रेड्डी-यशवंतराव चव्हाण) काँग्रेस असे दोन भाग झाले. हा वाद मिटवण्यासाठी दादांनी प्रयत्न केले. १९७९ मध्ये समाजवादी काँग्रेसमधील दादांसह शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, स. का. पाटील, नरेंद्र तिडके हे नेते पुन्हा इंदिरा काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत दादा सांगलीतून खासदार बनले.

वसंतदादांचे संगठन कौशल्य पाहून इंदिरा गांधींनी त्यांना १९८० मध्ये केंद्रीय मंत्रिपदाची आॅफर दिली होती. मात्र दादांनी ती नाकारली. अखेर इंदिराजींनी त्यांच्यावर २० आॅगस्ट १९८० रोजी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली. १९८३ च्या सुरुवातीस दादा पुन्हा राज्यात परतले. ३१ जानेवारीस काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक झाली. त्यात दादा आणि यशवंतराव मोहिते यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी लढत झाली. दादा निवडून आले. त्यांच्या त्या विजयामागेही इंदिरा गांधींच्या ‘सदिच्छा’ होत्या...काँग्रेस भवनचे उदघाटनतत्कालीन दक्षिण सातारा म्हणजे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस भवनचे उद्घाटन तत्कालीन अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिरा गांधी यांच्याहस्ते १३ आॅक्टोबर १९५९ रोजी झाले होते. त्याची कोनशीला सांगलीतील या काँग्रेस भवनात आहे.दादांच्या विरोधात प्रचारसभा१९७८ मध्ये महाअधिवेशन बोलावण्यावरून काँग्रेसमध्ये फूट पडली. फेब्रुवारीत निवडणुका जाहीर झाल्या. इंदिरा काँग्रेस आणि समाजवादी कॉँग्रेस (रेड्डी-यशवंतराव चव्हाण) अशी पक्षाची विभागणी झाली. दादा समाजवादी काँग्रेसमध्ये गेले. निवडणुकीत दादांच्या विरोधात इंदिरा काँग्रेसमधून थांबलेल्या युसूफ शेख यांच्या प्रचारासाठी इंदिरा गांधींनी स्वत: सांगलीत येऊन सभा घेतली होती.शालिनीतार्इंसाठी विराट सभामे १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी वसंतदादा खासदार असल्याने शालिनीताई पाटील यांना सांगलीतून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या प्रचारासाठी १४ मे १९८० रोजी इंदिरा गांधी यांची सांगलीत विराट सभा झाली होती.आष्टा नगरपालिकेस भेटआष्टा नगरपालिकेसही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भेट दिली होती. त्यांच्याहस्ते घरकूल योजनेचे उद्घाटन झाले होते. यावेळी विलासराव शिंदे, विजयमाला वग्याणी, मंदाकिनी रूकडे, गणपतराव कासार उपस्थित होते.आठवण पैलवानांचीवसंतदादा पाटील पाटबंधारेमंत्री असताना महाराष्टÑातील पैलवानांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटण्यास दिल्लीला गेले. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या बंगल्याच्या हिरवळीवर त्यांच्यासोबत मुख्यमंत्री वसंतराव नाईक, वसंतदादा आणि हिंदकेसरी मारुती माने, गणपतराव आंदळकर, दादू चौगुले आदींनी छायाचित्र काढून घेतले होते.