शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

कुरघोड्या कराल, तर जशास तसे उत्तर

By admin | Updated: April 9, 2015 00:03 IST

संजय पाटील : म्हैसाळ योजनेबाबत काही नेत्यांकडून जनतेची दिशाभूल

सांगली : मोठ्या प्रयत्नाने म्हैसाळचे पंप सुरू झाले असून, शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. परंतु याप्रश्नी वारंवार काही नेत्यांकडून लोकांची दिशाभूल केली जात आहे. अशा गोष्टीत कोणी कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले की, सकाळी म्हैसाळ टप्पा क्र. १ येथे जाऊन पाहणी केली. मागील पाच वर्षांपासून पंपांची दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी दारांची तोडफोड करण्यात आली आहे. त्याची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार आहे. अशी परिस्थिती असली तरीही अधिकाऱ्यांनी म्हैसाळचे तीन पंप सुरू केले आहेत. ते पूर्ण क्षमतेचे चालविण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे हित साधले जाणार आहे. तरीही त्यांच्यामध्ये काहीजण येण्याची शक्यता आहे. कॅनॉल व दरवाजे फोडून पाणी चोरणे आदी प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे घडले तर, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या आड येणाऱ्या मंडळींवर नाईलाजाने कारवाई करावी लागेल.
दुरुस्ती खर्चासाठी २ कोटी निधीची मागणी असून, आवर्तन संपल्यानंतर संबंधित निधी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या शनिवारी बेडग येथील पंपाची पाहणी करण्यात येणार आहे. त्यावेळी पाणी क्षेत्राचा लाभ होणाऱ्या गावातील प्रमुख नागरिकांची बैठक घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांना पाणी मागणीचे फॉर्म भरणे गरजेचे आहे. म्हैसाळप्रश्नी कोणी राजकारण करू नये. अधिकाऱ्यांनी कोणाच्याही राजकारणाला बळी पडू नये, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. रोटेशन पध्दतीनेच पाणी सोडण्यात येणार आहे. सोशल मीडियावरून काहीजण टीका-टिप्पणी करण्यात मग्न आहेत. परंतु कोणीही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करू नये. (प्रतिनिधी)


पुतनामावशीचे प्रेम ओळखून...
नागेवाडी येथील यशवंत कारखान्याची सुनावणी बुधवारी दिल्लीत झाली. त्यामध्ये अनिल बाबर यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तसेच हा खटला काढून टाकण्यास सांगितले आहे. यामुळे बाबर यांनी खटला मागे घेतला आहे. भविष्यकाळात या प्रश्नावरून ग्रामस्थांकडून पैसे काढण्याचा उद्योग कोणी करू नये कारण पुतनामावशीचे प्रेम लोक ओळखून असल्याचे पाटील यांनी सांगितले.
म्हैसाळच्या वीजबिलाची थकबाकी ४ कोटी रुपये आहे. आणखी दोन महिने योजना कार्यान्वित करायची झाल्यास ६ कोटी विजेचा खर्च आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.