शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

दोन-तीन महिन्यांत वर्षभराचा विकासनिधी कसा संपवणार?, जिल्हा परिषदेच्या आचारसंहितेची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 12:53 IST

राज्यातील सत्तेचा लंबक सतत इकडून तिकडे फिरत राहिल्याचा प्रतिकूल परिणाम विकासकामांवर झाला

संतोष भिसेसांगली : संपत आलेले २०२२ हे वर्ष राजकीय गोंधळ आणि निवडणुकांच्या साठमारीतच गेले. राज्यातील सत्तेचा लंबक सतत इकडून तिकडे फिरत राहिल्याचा प्रतिकूल परिणाम विकासकामांवर झाला. सर्वसामान्यांची कामे तर थांबलीच, शिवाय आता प्रशासनाचीही कसोटी लागणार आहे. विकासकामांचा निधी १०० टक्के खर्च करण्यासाठी अवघा दोन-तीन महिन्यांचाच कालावधी शिल्लक राहणार आहे. वर्षभराचा निधी अवघ्या दोन-तीन महिन्यांतच संपवावा लागणार आहे. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी २३ डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे सुमारे १३८ कोटींची कामे थांबली आहेत. प्रशासन निवडणुकीतून रिकामे झाल्यावर नव्या वर्षात कामाला लागेल, तोपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागेल. त्याची आचारसंहिता लागली, तर पुन्हा ब्रेक लागणार आहे. राज्यात ठाकरे सरकार सत्तेत असेपर्यंत अनेक कामांचे प्रस्ताव मंजूर झाले होते. जून महिन्यात शिंदे सरकारने सर्व कामांना स्थगिती दिली. नंतर त्यातील काही कामे टप्प्याटप्प्याने पुन्हा मंजूर केली, पण ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेमुळे काही कामे रखडली. 

जिल्ह्याची अनेक महत्वाची कामे नियोजन समितीमधून मार्गी लागतात. सरकार बदलाच्या प्रक्रियेदरम्यान ती खोळंबली होती. वार्षिक योजनेचे ३६४ कोटी रूपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाचे ८३ कोटी ८१ लाख रूपये, आदिवासी घटक कार्यक्रमाचे १ कोटी १ लाख रूपये अशी एकूण ४४८ कोटी ८२ लाखांची कामे मंजुरीच्या प्रक्रियेत होती. सप्टेंबरअखेर वार्षिक योजनेसाठी शासनाकडून १११ कोटी ४२ लाख रूपये प्राप्त झाले. यामधील ३७ कोटी २९ लाख रूपये खर्ची पडले. उर्वरीत निधीच्या वेळेत खर्चासाठी गतीने नियोजन करावे लागणार आहे. ४०४ कोटी ७९ लाख रूपये प्राप्त सन २०२१-२२ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेसाठी ३२० कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी ८३ कोटी ८१ लाख रूपये व आदिवासी घटक कार्यक्रमासाठी ९८ लाख रूपये असे एकूण ४०४ कोटी ७९ लाख रूपये प्राप्त झाले होते. मार्च २०२२ अखेर ४०३ कोटी ६१ लाख रूपये  खर्च झाले. उर्वरीत कामे या वर्षात संपवायची आहेत.

निधीच नाही, त्यामुळे खर्चाचा प्रश्नच नाहीदरम्यान, शासनाकडून निधी पुरवठ्यात हात आखडता घेतला जात आहे. सध्या सुरु असलेल्या व प्रशासकीय, तांत्रिक मान्यतेच्या कामांनाच निधी मिळत आहे. नव्या कामांना निधीची टंचाई आहे. निधीच नाही, त्यामुळे मार्चअखेर संपविण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार नाही असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर..

  • नव्या कामांना वेळेत प्रशासकीय मंजुरी घेऊन ठेवावी लागेल
  • नियोजन समितीतील कामांना दोन वर्षांची मुदत असल्याने दिलासा
  • आमदार, खासदार निधीतील कामांवर निर्बंधांची शक्यता
  • मार्चअखेर प्रतिपुर्तीला मुदतवाढ घ्यावी लागेल
  • औषध खरेदी, स्मार्ट पीएचसी, मॉडेल स्कूल अशा कामांपुढे निधीचे संकट
  •  कृषी, सार्वजनिक बांधकाम आदी राज्य शासनाच्या विभागांपुढे संकट नाही
टॅग्स :SangliसांगलीCode of conductआचारसंहिता