शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सांगली जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले, गारपिटीचाही फटका; द्राक्षबागांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:04 IST

सांगली : ढगांचा गडगडाट अन् मेघगर्जनेसह मंगळवारी सायंकाळी सांगली जिल्ह्यातील काही भागांत उन्हाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी ...

सांगली : ढगांचा गडगडाट अन् मेघगर्जनेसह मंगळवारी सायंकाळी सांगली जिल्ह्यातील काही भागांत उन्हाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावात गारपीट झाली असून शिराळा, पलूस, कडेगाव व खानापूर तालुक्यातील काही गावात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसाने द्राक्ष व बेदाणा उत्पादकांची चिंता वाढली आहे. तसेच, आंब्याच्या बागांनाही फटका बसला आहे.सांगली जिल्ह्यात मंगळवारी दुपारी उन्हाच्या तीव्र झळांचा सामना नागरिकांना करावा लागला. त्यामुळे ३७ अंशांवर पारा गेला होता. मंगळवारी दुपारनंतर वारे सुरू झाले. त्यानंतर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने दिवसभर उकाड्याने नागरिक त्रस्त होते. दुपारनंतर जिल्ह्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण होते. दुपारी चारनंतर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. पलूस, शिराळा, तासगाव व कडेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी सरी बरसल्या. खानापूर तालुक्यातील विटा परिसरात उन्हाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.उकाड्याने त्रस्त नागरिकांना पावसाने दिलासा दिला असला, तरी काही भागांत शेतकऱ्यांना चिंतेत टाकले आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी व गुरुवारी सायंकाळीही मेघगर्जनेसह मोठ्या पावसाचा अंदाज आहे. तासगाव तालुक्यात मणेराजुरी व विसापूर येथे जोरदार गारपीट झाली. उर्वरित तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्यातील चरण परिसरात चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह उन्हाळी पाऊस पडला. पलूस तालुक्यातील दुधोंडी आणि घोगाव, दह्यारी, तुपारी, नागराळे, पुणदी परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

सांगली, मिरज शहरात ढगांची दाटीसांगली, मिरज शहरात मंगळवारी सायंकाळी पाचनंतर ढगांची दाटी झाली होती. शहर व परिसरात पावसाचा हलकासा शिडकावा झाला. दिवसभर शहरात तीव्र उन्हाच्या झळांनी नागरिकांना हैराण केले होते.

तिन्ही तालुक्यात शेतकऱ्यांची धांदलपावसामुळे मंगळवारी सायंकाळी शेतकऱ्यांची धांदल उडाली होती. तासगाव तालुक्यात अनेक ठिकाणी द्राक्ष बागायतदारांनी बेदाणा निर्मितीसाठी शेड उभारले आहेत. अवकाळी पावसाचे संकट वाढवल्याने उत्पादक हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी कडबा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरु होती.

रात्रीचा उकाडा वाढलाजिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३७ अंशांवर गेले असताना किमान तापमानाचा आलेखही वाढत आहे. मंगळवारी किमान तापमान २४.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने रात्रीचा उकाडाही वाढला आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी