शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी; डाळींच्या नुकसानीने सांगलीत चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 12:44 IST

सांगली जिल्ह्यात मराठवाडा व विदर्भातून मोठ्या प्रमाणावर शेतीमाल येत असतो

अविनाश कोळीसांगली : मराठवाडा व विदर्भात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने सांगलीच्या बाजारपेठेची चिंता वाढली आहे. या भागातून सांगलीत होणाऱ्या सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांच्या आवकवर व पर्यायाने दरावर आगामी काळात मोठा परिणाम होण्याचा अंदाज येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.सांगली जिल्ह्यात मराठवाडा व विदर्भातून मोठ्या प्रमाणावर शेतीमाल येत असतो. सांगलीच्या बाजारात उडीद व मूग डाळीचा ७० टक्के पुरवठा हा मराठवाड्यातील आहे. तसेच तूर डाळीचाही पुरवठा केला जातो. सांगलीच्या बाजारपेठेशी या दोन्ही विभागांचे नाते आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातील संकटाने सांगलीच्या बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

विदर्भ व मराठवाड्यातील सुमारे ८ लाख ५७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांचा समावेश आहे. पंचनाम्यानंतर याचे चित्र स्पष्ट होणार असले तरी सांगलीच्या बाजारात येणारा माल सुमारे ३० टक्क्यांनी घटण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या बाजारात तूर डाळीचा भाव १२ टक्क्यांनी वाढला असून, महागाईने कळस गाठला असताना त्यात आता या नुकसानीमुळे होणाऱ्या दरवाढीची भर पडणार आहे.

तूर डाळ दहा रुपयांनी महागलीसांगलीच्या बाजारात सात दिवसांतच तूर डाळीच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. साधी तूर डाळ ८५ रुपये किलोवरून आता ९५ रुपयांवर गेली आहे. प्रेसिडेंट तूर डाळ ९५ रुपयांवरून ११० रुपये झाली आहे. म्हणजेच १२ टक्के वाढ झाली आहे. मराठवाड्यातील नुकसानीमुळे येत्या काही महिन्यांत तूर डाळीचे दर वाढण्याचीच चिन्हे दिसत आहेत.

मागील वर्षीही फटका

ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ मध्येही विदर्भ व मराठवाड्यात पावसाने पिकांची मोठी हानी झाली होती. त्यावेळीही डाळींसह हळदीच्या आवकवर व दरावर परिणाम झाला होता.

मराठवाड्यातील नुकसानीमुळे सांगलीच्या बाजारपेठेतील तूर डाळीची उपलब्धता पुढील काळात घटण्याची शक्यता आहे. त्याचा फटका येथील बाजाराला निश्चितपणे बसेल. या हानीमुळे दर कमी होण्याची शक्यता मावळली आहे. - एस. एम. गाला, व्यापारी, सांगली

सांगली जिल्ह्यात मराठवाड्यातून कडधान्यांची मोठी आवक होत असते. त्याठिकाणच्या पिकांच्या नुकसानीचा परिणाम आगामी काळात येथील बाजारातील आवकेवर व पर्यायाने दरावर होण्याची शक्यता आहे. - अण्णासाहेब चौधरी, माजी संचालक, मार्केट कमिटी, सांगली

टॅग्स :SangliसांगलीVidarbhaविदर्भRainपाऊस