शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
3
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
4
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
5
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
6
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
7
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
8
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
9
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
10
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
11
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
12
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
13
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
14
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
15
शांततेचे दूत! ट्रम्प यांच्यासाठी शाहबाज शरीफ यांच्याकडून नोबेलची मागणी; मेलोनींनी तोंडावर ठेवला हात
16
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!
17
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
18
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
19
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
20
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले

अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:10 IST

शेतकरी संकटाने बेजार झाले

सांगली : कृष्णा आणि वारणा नदीच्या पुराने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्वप्नच पाण्यात वाहून गेले आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे तब्बल ११ हजार ७५७ शेतकऱ्यांचे चार हजार ९७१ हेक्टरवरील बागायती आणि फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यांतील १११ गावांतील शेतकरी या संकटाने बेजार झाले आहेत.जिल्ह्यात मे २०२५ पासून सतत पाऊस सुरू आहे. जूनमध्ये अखंडित १५ दिवस पाऊस चालू झाल्यामुळे खरीप पेरण्या करण्यातही अडचणी आल्या होत्या. तरीही उघडीप मिळालेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या. ऑगस्ट महिन्यात संततधार पाऊस सुरू झाल्यामुळे वारणा आणि कोयना धरणातून विसर्ग सुरू केला. म्हणूनच कृष्णा आणि वारणा नद्यांना मागील आठवड्यात पूर आला. पुराचे पाणी जवळपास आठ ते दहा दिवस पिकात थांबले होते. यातूनच भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील पलूस, शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यांतील ११ हजार ७५७ शेतकऱ्यांचे चार हजार ९७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागांकडून सध्या चालू आहेत.

तालुकानिहाय पिकांचे नुकसानतालुका / बाधित शेतकरी / गावे / क्षेत्र (हेक्टरमध्ये)मिरज - २९०० / २२ / १९६२.९वाळवा - ३६३५ / ३९ / १२७९शिराळा - २३२२ / २८ / ५७०पलूस - २९०० / २२ / ११६०एकूण - ११७५७ / १११ / ४९७१

शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेकृष्णा आणि वारणा नदीच्या पुराने सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. ऊस, सोयाबीन, भात, द्राक्षे आणि इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिके घेतली होती, पण पुराने सर्व आशा पाण्यात बुडवल्या. ‘सर्व काही वाहून गेले, आता पुढे काय करायचे?’ अशी हताश भावना शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे.

प्रशासनाकडून पंचनाम्यांना वेगजिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि पुनर्वसनाची गरज आहे. या संकटातून सावरण्यासाठी शासन आणि समाजातील सर्व घटकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.

शेतकऱ्यांचा लढा कायमनिसर्गाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले, तरी त्यांचा लढण्याचा आत्मविश्वास अजूनही कायम आहे. आता सरकारकडून तातडीची मदत आणि योग्य भरपाई मिळावी, अशी अपेक्षा सांगलीतील शेतकरी व्यक्त करत आहेत.