शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

Hatkanangle LokSabha Constituency: इस्लामपूर-शिराळ्यात जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेचा कस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 17:03 IST

ऊसकरी शेतकऱ्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार

अशोक पाटीलइस्लामपूर : हातकणंगलेलोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी स्वबळावर रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि उद्धव सेनेचे (उबाठा) उमेदवार सत्यजित पाटील यांनी नव्यानेच एन्ट्री केली आहे. या तिरंगी लढतीत विविध पक्षांच्या नेत्यांनाच स्वत:च्या अस्तित्वासाठी लढाई करावी लागणार आहे. विशेषत: इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाचा प्रश्न उभा ठाकणार आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना ९३ हजार २५० मते मिळाली होती. शिराळा विधानसभा मतदारसंघात ९८ हजार ३४६ मते मिळाली. त्यांच्याच विरोधात असलेल्या धैर्यशील माने यांना इस्लामपूर मतदारसंघात ७४ हजार ७०० तर शिराळा मतदारसंघात ७७ हजार ४२२ मते मिळाली. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत राजू शेट्टी यांनी ३९ हजार ४७४ मतांनी आघाडी मिळवली होती.शेट्टी यांच्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी, शाहूवाडी आणि हातकणंगले मतदारसंघात त्यांची पीछेहाट झालेली असताना या दोन विधानसभा मतदारसंघांनी मात्र त्यांना चांगला हात दिला. त्यात आमदार पाटील यांच्यासह शेट्टी यांच्या शेतकरी चळवळीतील योगदानाला लोकांनी मतपेटीतून दिलेले ते पाठबळ होते.या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. गत निवडणुकीत शेट्टी महाविकास आघाडीत सामील असल्याने त्यांच्या पाठीशी आमदार पाटील यांची ताकद होती. त्यामुळेच धैर्यशील माने यांच्याविरोधात शेट्टी यांना मतांची आघाडी मिळाली. माने यांच्या बाजूने राष्ट्रवादी विरोधातील सर्वच गट एकवटले होते. तरीही झालेल्या पराभवाची शेट्टी यांना आजही खंत आहे. त्यामुळेच या निवडणुकीत शेट्टी यांनी 'एकला चलो'ची भूमिका घेतली आहे.

यावेळी उद्धव सेनेचे उमेदवार सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने चुरशीची तिरंगी लढत रंगणार आहे. सत्यजित पाटील यांचे वडील बाबासाहेब पाटील हे चिखली (ता. शिराळा) च्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे गेली पंचवीस वर्षे उपाध्यक्ष आहेत. शिवाय भौगोलिकदृष्ट्या शाहूवाडीशी हा मतदारसंघ संलग्न आहे. त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो.शिवाय आमदार जयंत पाटील यांची ताकद त्यांच्या पाठीशी असेल. राष्ट्रवादीच्या विरोधातील सगळे गट यावेळीही खासदार माने यांच्यासोबत असतील. साखर टापूतील ऊस उत्पादक कुणाला झुकते माप देणार हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळेच या मतदारसंघातील उमेदवारापेक्षा नेत्यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न महत्त्वाचा आहे.

एका मताची ताकद..या दोन्ही मतदारसंघात आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची ताकद सत्यजित पाटील यांच्या पाठीशी आहे. धैर्यशील माने यांच्या पाठीशी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे सत्यजित देशमुख, निशिकांत पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, शिवसेनेचे आनंदराव पवार यांची ताकद एकवटणार आहे. राजू शेट्टी यांची ऊर्जा ऊस उत्पादक शेतकरी हीच आहे. ऊस दरासाठी संघर्ष करणारे आणि कारखानदारांना अंगावर घेणाऱ्या नेतृत्वाला ताकद द्यायची की नाही, याचा फैसला त्यांच्या एका मतावर होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरhatkanangle-acहातकणंगलेlok sabhaलोकसभाJayant Patilजयंत पाटील