शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
Kolhapur Mahadevi Elephant : अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
3
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
4
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
5
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
6
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
7
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
8
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
9
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
10
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
11
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
12
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
13
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
14
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
15
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
16
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
17
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
18
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
19
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
20
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी

Hatkanangle LokSabha Constituency: इस्लामपूर-शिराळ्यात जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेचा कस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 17:03 IST

ऊसकरी शेतकऱ्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार

अशोक पाटीलइस्लामपूर : हातकणंगलेलोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी स्वबळावर रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि उद्धव सेनेचे (उबाठा) उमेदवार सत्यजित पाटील यांनी नव्यानेच एन्ट्री केली आहे. या तिरंगी लढतीत विविध पक्षांच्या नेत्यांनाच स्वत:च्या अस्तित्वासाठी लढाई करावी लागणार आहे. विशेषत: इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाचा प्रश्न उभा ठाकणार आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना ९३ हजार २५० मते मिळाली होती. शिराळा विधानसभा मतदारसंघात ९८ हजार ३४६ मते मिळाली. त्यांच्याच विरोधात असलेल्या धैर्यशील माने यांना इस्लामपूर मतदारसंघात ७४ हजार ७०० तर शिराळा मतदारसंघात ७७ हजार ४२२ मते मिळाली. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत राजू शेट्टी यांनी ३९ हजार ४७४ मतांनी आघाडी मिळवली होती.शेट्टी यांच्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी, शाहूवाडी आणि हातकणंगले मतदारसंघात त्यांची पीछेहाट झालेली असताना या दोन विधानसभा मतदारसंघांनी मात्र त्यांना चांगला हात दिला. त्यात आमदार पाटील यांच्यासह शेट्टी यांच्या शेतकरी चळवळीतील योगदानाला लोकांनी मतपेटीतून दिलेले ते पाठबळ होते.या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. गत निवडणुकीत शेट्टी महाविकास आघाडीत सामील असल्याने त्यांच्या पाठीशी आमदार पाटील यांची ताकद होती. त्यामुळेच धैर्यशील माने यांच्याविरोधात शेट्टी यांना मतांची आघाडी मिळाली. माने यांच्या बाजूने राष्ट्रवादी विरोधातील सर्वच गट एकवटले होते. तरीही झालेल्या पराभवाची शेट्टी यांना आजही खंत आहे. त्यामुळेच या निवडणुकीत शेट्टी यांनी 'एकला चलो'ची भूमिका घेतली आहे.

यावेळी उद्धव सेनेचे उमेदवार सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने चुरशीची तिरंगी लढत रंगणार आहे. सत्यजित पाटील यांचे वडील बाबासाहेब पाटील हे चिखली (ता. शिराळा) च्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे गेली पंचवीस वर्षे उपाध्यक्ष आहेत. शिवाय भौगोलिकदृष्ट्या शाहूवाडीशी हा मतदारसंघ संलग्न आहे. त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो.शिवाय आमदार जयंत पाटील यांची ताकद त्यांच्या पाठीशी असेल. राष्ट्रवादीच्या विरोधातील सगळे गट यावेळीही खासदार माने यांच्यासोबत असतील. साखर टापूतील ऊस उत्पादक कुणाला झुकते माप देणार हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळेच या मतदारसंघातील उमेदवारापेक्षा नेत्यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न महत्त्वाचा आहे.

एका मताची ताकद..या दोन्ही मतदारसंघात आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची ताकद सत्यजित पाटील यांच्या पाठीशी आहे. धैर्यशील माने यांच्या पाठीशी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे सत्यजित देशमुख, निशिकांत पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, शिवसेनेचे आनंदराव पवार यांची ताकद एकवटणार आहे. राजू शेट्टी यांची ऊर्जा ऊस उत्पादक शेतकरी हीच आहे. ऊस दरासाठी संघर्ष करणारे आणि कारखानदारांना अंगावर घेणाऱ्या नेतृत्वाला ताकद द्यायची की नाही, याचा फैसला त्यांच्या एका मतावर होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरhatkanangle-acहातकणंगलेlok sabhaलोकसभाJayant Patilजयंत पाटील