शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गुरुजींच्या भरतीस मुहूर्त उमेदवारांच्या आशा पल्लवित : राज्यात २४ हजार जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:17 IST

शरद जाधव।सांगली : गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला यंदा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता चाचणीचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर केला आहे. आता भरती प्रक्रिया राबविण्यासाठी तयार केलेल्या ‘पवित्र’ प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने, येत्या दोन महिन्यात शिक्षक भरतीबाबत डी.एड्., बी.एड्.धारक तरूणांमध्ये नोकरीची आशा ...

ठळक मुद्दे‘टेट’च्या निकालानंतर ‘पवित्र’कडे नजरा

शरद जाधव।सांगली : गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला यंदा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता चाचणीचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर केला आहे. आता भरती प्रक्रिया राबविण्यासाठी तयार केलेल्या ‘पवित्र’ प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने, येत्या दोन महिन्यात शिक्षक भरतीबाबत डी.एड्., बी.एड्.धारक तरूणांमध्ये नोकरीची आशा पल्लवित झाल्या आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदरच भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.राज्यभरात शिक्षकांचे ठरलेले अतिरिक्तचे प्रमाण व इतर कारणांनी सहा वर्षांपूर्वी शासनाने शिक्षक भरती पूर्णपणे बंद केली. असे असले तरी, डी.एड्. व बी.एड्. शिक्षण घेतलेले असंख्य तरूण, तरूणी नोकरीच्या आशेवर निर्णय बदलण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने अधिकृतपणे अद्यापही भरतीवरील बंदी उठल्याचे जाहीर केले नसले तरी, शिक्षक भरतीसाठी नव्याने सुरू केलेली शिक्षक अभियोग्यता (टेट) चाचणी घेऊन त्याचा निकालही शासनाने जाहीर केला आहे. तसेच दुसरीकडे संपूर्ण भरती प्रक्रिया ज्या प्रणालीआधारे केली जाणार आहे, त्या ‘पवित्र’ प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे परीक्षा परिषदेच्यावतीने सांगण्यात आले आहे. राज्यातील शिक्षित बेरोजगारांनी मुंबईत मोर्चाने धडक मारल्यानंतर शासनाने भरतीचे आश्वासन दिले होते. दरवेळी वेगवेगळी कारणे देऊन भरती पुढे ढकलण्यात येत आहे. मात्र, आता प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे.तरुणाईचा सोशल मीडियावर : जागरडी.एड्., बी.एड्.धारकांच्या बेरोजगारीत होत असलेली वाढ लक्षात घेऊन, या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी तरूणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शासनाला जाग आणण्याचे काम चालू केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दररोज एक ‘ट्वीट’ करण्यात येत असून, यातून त्यांना शिक्षक भरतीबाबतची ‘आठवण’ करून दिली जात आहे. विशेष म्हणजे बेरोजगार तरूणांच्या या ‘ट्वीट’ला विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.बेरोजगारांना अपेक्षाडी.एड्. व बी.एड्. झालेले असंख्य तरूण सध्या तुटपुंज्या मानधनावर, तर काहीजण विनामोबदला विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देत आहेत. मे २०१२ मध्ये शासनाने भरतीवर लादलेल्या बंदीमुळे अनेकजण आर्थिक संकटात सापडले होते. आता शासनस्तरावरून अभियोग्यता चाचणी घेऊन भरती प्रक्रियाही राबविण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील हजारो डी.एड्., बी.एड्.धारकांना नोकरीची अपेक्षा आहे.सध्या शिक्षकांवर असलेला ताण लक्षात घेता, शासनाने अगोदरच भरती प्रक्रियेतून रिक्त जागा भरायला हव्या होत्या. शासन धोरणामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना अडचणी येत आहेत. जूनला शाळा सुरू होण्यापूर्वी भरती झाल्यास अडचणी दूर होतील. आरटीईच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांची पदे भरणे आवश्यक आहे.-अमोल शिंदे, जिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन हक्क संघटना, सांगली जिल्हा

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTeacherशिक्षक