शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

सांगली जिल्ह्यात भाजपने जिंकल्या सर्वाधिक जागा, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 13:23 IST

सांगली : जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ३१ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले असून २७ ग्रामपंचायती मिळवून राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहिली ...

सांगली : जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ३१ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले असून २७ ग्रामपंचायती मिळवून राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. काँग्रेस व माजीमंत्री अजितराव घोरपडे गटाने प्रत्येकी सात ग्रामपंचायती ताब्यात घेऊन ग्रामीण भागातील अस्तित्व कायम ठेवण्यात यश मिळविले. शिंदे गटाच्या शिवसेनेने सहा ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. तरमनसेने एक ग्रामपंचायत ताब्यात घेऊन ग्रामीण राजकारणात चंचू प्रवेश केला आहे.सांगली जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. यामध्ये १३ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध आणि ११ ग्रामपंचायतीचे पॅनेल बिनविरोध झाले आहे. पूर्णतः बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच वगळून उर्वरित ८३ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान रविवारी झाले होते.

राष्ट्रवादीने शिराळा तालुक्यातील २९ पैकी सर्वाधिक १५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवून आमदार मानसिंगराव नाईक, माजीमंत्री शिवाजीराव नाईक आघाडी ग्रामीण मतदाराने स्वीकारल्याचा कौल आहे. वाळवा तालुक्यातील चारपैकी तीन ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यशस्वी ठरले. पण, कारंदवाडी या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मित्र पक्षांचे सहकार्य घेऊन भाजपने शिरकाव केला आहे. येथे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील माजी सदस्य संभाजी कचरे यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव झाला.आटपाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीपैकी नऊ ग्रामपंचायती आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख गटाने जिंकल्या. शिवसेना चार आणि स्थानिक आघाड्यांनी चार ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले. येथे काँग्रेस, राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही. जत तालुक्यातील सर्व पाचही ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यशस्वी ठरले. कवठेमहांकाळ तालुक्यातील २० पैकी आठ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे ठेवण्यात आमदार सुमनताई पाटील यांना यश आले. तसेच सात ग्रामपंचायती खेचून आणण्यात माजी मंत्री अजितराव घोरपडे यशस्वी झाले आहेत.

कडेगाव तालुक्यातील तीन पैकी दोन ग्रामपंचायती काँग्रेसकडे ठेवण्यात माजीमंत्री विश्वजित कदम यांना यश आले आहे. एका ग्रामपंचायतीवर भाजपला समाधान मानावे लागले. पलूस तालुक्यातील चारपैकी काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. तासगावमध्ये दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व राखण्यात खासदार संजय पाटील यशस्वी झाले. खानापूर तालुक्यात दोन ग्रामपंचायती शिवसेनेचे आमदार अनिल बाबर गटाकडे तर दोन ग्रामपंचायती भाजप-राष्ट्रवादी आघाडीला मिळाल्या आहेत.

पक्षीय बलाबलपक्ष -ग्रामपंचायती संख्याभाजप -३१राष्ट्रवादी -२७काँग्रेस -०७घोरपडे गट -०७शिंदे गट शिवसेना -०६स्थानिक आघाड्या -१६

पालकमंत्र्यांना धक्कामिरज तालुक्यातील जानराववाडी आणि निलजी बामणी या ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविण्यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आपले पॅनेल उभे केले. त्यासाठी खूप प्रयत्न करूनही त्यांच्या पॅनेलला अपयशाला सामोरे जावे लागले. भाजप आणि पालकमंत्री खाडे यांना मोठा धक्का आहे. या दोन्ही गावांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजय झाले आहेत.

कारंदवाडीत जिप सदस्याचा पराभवकारंदवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सरपंचपदाचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजी कचरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा कचरे गट समर्थक आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतResult Dayपरिणाम दिवसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस