शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

सांगली जिल्ह्यात भाजपने जिंकल्या सर्वाधिक जागा, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 13:23 IST

सांगली : जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ३१ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले असून २७ ग्रामपंचायती मिळवून राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहिली ...

सांगली : जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ३१ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले असून २७ ग्रामपंचायती मिळवून राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. काँग्रेस व माजीमंत्री अजितराव घोरपडे गटाने प्रत्येकी सात ग्रामपंचायती ताब्यात घेऊन ग्रामीण भागातील अस्तित्व कायम ठेवण्यात यश मिळविले. शिंदे गटाच्या शिवसेनेने सहा ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. तरमनसेने एक ग्रामपंचायत ताब्यात घेऊन ग्रामीण राजकारणात चंचू प्रवेश केला आहे.सांगली जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. यामध्ये १३ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध आणि ११ ग्रामपंचायतीचे पॅनेल बिनविरोध झाले आहे. पूर्णतः बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच वगळून उर्वरित ८३ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान रविवारी झाले होते.

राष्ट्रवादीने शिराळा तालुक्यातील २९ पैकी सर्वाधिक १५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवून आमदार मानसिंगराव नाईक, माजीमंत्री शिवाजीराव नाईक आघाडी ग्रामीण मतदाराने स्वीकारल्याचा कौल आहे. वाळवा तालुक्यातील चारपैकी तीन ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यशस्वी ठरले. पण, कारंदवाडी या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मित्र पक्षांचे सहकार्य घेऊन भाजपने शिरकाव केला आहे. येथे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील माजी सदस्य संभाजी कचरे यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव झाला.आटपाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीपैकी नऊ ग्रामपंचायती आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख गटाने जिंकल्या. शिवसेना चार आणि स्थानिक आघाड्यांनी चार ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले. येथे काँग्रेस, राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही. जत तालुक्यातील सर्व पाचही ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यशस्वी ठरले. कवठेमहांकाळ तालुक्यातील २० पैकी आठ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे ठेवण्यात आमदार सुमनताई पाटील यांना यश आले. तसेच सात ग्रामपंचायती खेचून आणण्यात माजी मंत्री अजितराव घोरपडे यशस्वी झाले आहेत.

कडेगाव तालुक्यातील तीन पैकी दोन ग्रामपंचायती काँग्रेसकडे ठेवण्यात माजीमंत्री विश्वजित कदम यांना यश आले आहे. एका ग्रामपंचायतीवर भाजपला समाधान मानावे लागले. पलूस तालुक्यातील चारपैकी काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. तासगावमध्ये दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व राखण्यात खासदार संजय पाटील यशस्वी झाले. खानापूर तालुक्यात दोन ग्रामपंचायती शिवसेनेचे आमदार अनिल बाबर गटाकडे तर दोन ग्रामपंचायती भाजप-राष्ट्रवादी आघाडीला मिळाल्या आहेत.

पक्षीय बलाबलपक्ष -ग्रामपंचायती संख्याभाजप -३१राष्ट्रवादी -२७काँग्रेस -०७घोरपडे गट -०७शिंदे गट शिवसेना -०६स्थानिक आघाड्या -१६

पालकमंत्र्यांना धक्कामिरज तालुक्यातील जानराववाडी आणि निलजी बामणी या ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविण्यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आपले पॅनेल उभे केले. त्यासाठी खूप प्रयत्न करूनही त्यांच्या पॅनेलला अपयशाला सामोरे जावे लागले. भाजप आणि पालकमंत्री खाडे यांना मोठा धक्का आहे. या दोन्ही गावांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजय झाले आहेत.

कारंदवाडीत जिप सदस्याचा पराभवकारंदवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सरपंचपदाचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजी कचरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा कचरे गट समर्थक आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतResult Dayपरिणाम दिवसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस