शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

सरकारला शेतक-यांची नव्हे, उद्योगपतींची चिंता : अण्णा हजारे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 10:44 PM

मागील १५ वर्षांत २२ लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या. या कालावधित माझ्या वस्तूला भाव मिळत नाही म्हणून कुठल्या उद्योगपतीने आत्महत्या केली नाही.

आटपाडी -   मागील १५ वर्षांत २२ लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या. या कालावधित माझ्या वस्तूला भाव मिळत नाही म्हणून कुठल्या उद्योगपतीने आत्महत्या केली नाही. शेतक-यांच्या मालाला भाव मिळत नाही म्हणून तो आत्महत्या करतो; पण सरकारला शेतक-यांची नाही, तर उद्योगपतींची चिंता आहे. त्यासाठी २३ मार्चला दिल्लीत मोठे आंदोलन करतोय. देशातल्या कुठल्याच तुरुंगात ठेवायला जागा पुरणार नाही, एवढ्या संख्येने आंदोलनात सामील व्हा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे केले.

येथील बचतधामच्या मैदानात अण्णा हजारे यांची सभा झाली. ते म्हणाले, अजूनही चिरीमिरी दिल्याशिवाय लोकांची कामे होत नाहीत. शेतकºयांची झोपडी बदलत नाही आणि दलालांनी मात्र २० मजले बांधले. देशात सर्वत्र ‘माल खाये मदारी आणि नाच करे बंदर’! अशी स्थिती आहे. राज्यातील कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ राज्याच्या कृषीमूल्य आयोगाला शेतक-यांच्या मालाचा भाव कळवितात. ते केंद्र शासनाच्या कृषीमूल्य आयोगाला कळवितात. तिथे त्यामध्ये ४० टक्के कपात केली जाते म्हणून शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. हे थांबले पाहिजे. आम्ही शेतकºयांचा जेवढा खर्च होतो, त्याच्या दीडपटीने भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

पीक कर्जाला बँका चक्रवाढ व्याज लावतात. काही बँका सावकारापेक्षा अधिक २४ टक्के व्याज लावतात. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की, शेतकºयांना पीक कर्जाला चक्रवाढ व्याज लावायचे नाही. १९७२ पासून आतापर्यंत ज्या-ज्या बँकांनी असे व्याज लावले त्या शेतकºयांना परत द्या. कायदा मानत नाहीत, कुणी विचारत नाही म्हणून त्यांचे फावते आहे.आपल्या घटनेमध्ये प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. त्याचे पालन करा. ज्यांचे ६० वर्षे वय आहे आणि कुठली आवक नाही त्याला पाच हजार पेन्शन द्या, अशी आमची मागणी आहे. लोकसभेत पेन्शन बिल पडलंय, त्याची अंमलबजावणी करा. आता हालचाली सुरु झाल्या आहेत.समाजसेविका कल्पना इनामदार म्हणाल्या, राजकर्त्यांनी शेतक-यांचा चेंडू केला आहे. कुणीही येतं लाथ मारतं, जाईल तिकडे जाईल. शेतकºयांच्या प्रश्नांवर राजकारणी आंदोलन करतात; पण शेतकºयांच्या पदरी काहीच पडत नाही. यांनी शेतकºयांच्या प्रश्नांचे भांडवल म्हणून वापर सुरू केला आहे. टेंभूला निधी मिळाला म्हणून अनेकवेळा या भागात नेत्यांची पोस्टर लावली जातात. प्रत्यक्षात पुढे काय होतं? निधी कुठे जातो?त्यासाठी आता राजकारणविरहित, पक्षविरहित आंदोलन छेडण्याची आणि या लढ्यात प्रत्येकाने सहभाग घेण्याची गरज आहे.यावेळी राळेगणसिद्धीचे सरपंच राजेश आवटी, संभाजी देशमुख, वीरेंद्र राजमाने, व्ही. एन. देशमुख, आबा सागर यांनी मनोगत व्यक्त केले.  

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे