शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

पाकिस्तान का नाम मिटा दो : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:55 PM

काश्मीर येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचे सावट शुक्रवारी तासगावातील कार्यक्रमात दिसून आले. ‘अब जो नगाडा बज गया है सैतानोें का, नक्शे पर से नाम

ठळक मुद्देदहशतवादी कृत्याचा तीव्र शब्दात निषेध

तासगाव : काश्मीर येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचे सावट शुक्रवारी तासगावातील कार्यक्रमात दिसून आले. ‘अब जो नगाडा बज गया है सैतानोें का, नक्शे पर से नाम मिटा दो पाकिस्तान का’, अशा तीव्र शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानविरोधी संपात व्यक्त केला.

काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे सावट शुक्रवारी तासगावातील पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमावरही दिसून आले. सत्कार-समारंभाला फाटा देत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी मनोगत व्यक्त केलेल्या सर्वच मंत्र्यांनी पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाब्दिक हल्ला चढविला. पाकिस्तान भिकारी झालाय. त्यांचा पंतप्रधान जगभर कटोरा घेऊन फिरतोय. दुसरीकडे असे भ्याड हल्ले करतो. शहीद झालेल्या जवानांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही, आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. गनिमीकाव्याने कसा बदला घ्यायचा हे सांगायची गरज नाही. सर्जिकल स्ट्राईक करून आम्ही ते करून दाखवलंय.मला उतरवायचा आहे पाकचा माज : आठवलेखास कवितांसाठी प्रसिध्द असलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी, ‘तासगावमध्ये मी आलो आहे आज, कारण मला उतरवायचा आहे पाकिस्तानचा माज...’ अशा काव्यपंक्ती सादर करून पाकिस्तानवर कॉव्यबॉम्बमधून निशाणा साधला.

आठवले यांनी कवितेतूनच थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांवरच हल्ला चढवला. ‘हल्ले केले जातात, का वाटत नाही लाज, नरेंद्र मोदी तोडून टाकणार आहेत इम्रान खानचा माज’; ‘आज मला फोडावा लागेल पाकिस्तानचा डोळा, फिरवावा लागेल पाकिस्तानवर पेटलेला बोळा’, अशा शब्दात पाकिस्तानवर शब्दहल्ला चढवून त्यांनी निषेध व्यक्त केला. भारताबरोबर जिंंकायची पाकिस्तानची ताकद नाही. आम्ही वाघ आहोत, पाकिस्तान उंदरासारखे आहे. निवडणुकीच्यावेळी निवडणुका, पण देशासाठी आम्ही एकसंध असल्याचे आठवले यांनी सांगितले. पाकिस्तानवर काव्यहल्ला करणाऱ्या आठवलेंच्या कवितेला उपस्थितांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवले