शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सांगलीतील सराफाला पावणेचार कोटींचा गंडा, चौघे बंगाली कारागीर पावणेदोन किलो सोन्यासह पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 13:41 IST

सांगली : दहा वर्षांपासून विश्वास संपादन करून सांगलीतील सराफास तब्बल तीन कोटी ६९ लाख ९७ हजार ९६ रुपयांचा मूळ ...

सांगली : दहा वर्षांपासून विश्वास संपादन करून सांगलीतील सराफास तब्बल तीन कोटी ६९ लाख ९७ हजार ९६ रुपयांचा मूळ पश्चिम बंगालच्या चौघा कारागिरांनी गंडा घातला. दागिने करण्यासाठी सोन्याचे लगड (चोख सोने) घेऊन सोने करून देतो, असे सांगून चौघे संशयित पसार झाले. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात महेश्वर कांतेश्वर जवळे (रा. ओम सम्मुखा, प्लॉट नं. २, साखर कारखान्यासमोर, माधवनगर रोड, सांगली) यांनी रविवारी फिर्याद नोंदविली आहे.फिर्यादी महेश्वर जवळे यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी संशयित गौतम गोपाल दास, रुमा गौतम दास, सौरभ गोपाल दास आणि सुभा ऊर्फ सुभो गोविंद दास (सर्व रा. आटपाडी, मूळ गाव गोपानगर, दक्षिणपाडा पूर्व मेदनापूर, पश्चिम बंगाल ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.महेश्वर जवळे यांचे सराफ पेठेत सोन्या-चांदी दागिने विक्रीचे दुकान आहे. संशयित गौतम दास हा पश्चिम बंगाल येथील कारागीर मागील दहा वर्षांहून अधिक काळापासून आटपाडी येथे राहण्यास आहे. त्याने जिल्ह्यातील अनेक सराफांच्या ओळखी करून घेतल्या होत्या. त्यांच्याकडून चोख सोने घेऊन त्यांना दागिने बनवून देण्याचे काम तो आणि त्याचे कुटुंबीय करीत होते.फिर्यादी महेश्वर जवळे यांची देखील दास याच्याशी ओळख होती. दहा वर्षांपासून दास हा सराफ जवळे यांच्याकडून सोने घेऊन त्यांना दागिने तयार करून देत होता. दरम्यान, दि.३१ जुलै २०२४ ते दि.३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत फिर्यादी जवळे यांच्याकडून संशयित दास याने तीन कोटी ६९ लाख ९७ हजार ५९६ रुपयांचे एक हजार ७७४ ग्रॅम वजनाचे सोने घेतले होते; मात्र सदर सोने घेऊन चौघे संशयित पसार झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस