शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चांगुलपणाचा प्रवाह उलट्या दिशेचा असतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : चांगले काम करणाऱ्यांना नेहमीच खडतर परिस्थितीतून जावे लागते. कारण चांगुलपणाचा प्रवास हा उलट्या दिशेचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : चांगले काम करणाऱ्यांना नेहमीच खडतर परिस्थितीतून जावे लागते. कारण चांगुलपणाचा प्रवास हा उलट्या दिशेचा असतो, असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी बुधवारी व्यक्त केले.

स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव कराडकर आणि मातोश्री शांता कराडकर स्मृती ‘सेवारती पुरस्कार’ प्रदान सोहळा बुधवारी सांगलीत पार पडला. यंदा हा पुरस्कार अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांना डॉ. भवाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे होते.

यावेळी भवाळकर म्हणाल्या की, समाजात चांगला आणि वाईटाचा प्रवाह हा निरंतर वाहत असतो. आपण नेहमी चांगुलपणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात कोणत्याही चांगल्या कामाला विरोध हा असतोच, परंतु त्या विरोधाकडे दुर्लक्ष करून आपण समाजजागृतीचे कार्य सुरू ठेवले पाहिजे. अंनिसच्या कार्यकर्त्यांना अद्यापही विरोध होतो. परंतु, ज्या ध्येयाने नरेंद्र दाभोलकर यांनी समितीची स्थापना केली त्यापासून जराही न ढळता त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवलेले कार्य कौतुकास्पद आहे.

गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, प्रवाहासमवेत सर्वच पोहत असतात. परंतु प्रवाहाच्या विरोधात पोहणे धैर्याचे काम असते. ते धाडस अंनिसने दाखविले आहे. त्यांचे कार्यकर्ते अविरत समाजहिताचे कार्य करीत असतात. प्रवाहाला झुगारून देणाऱ्यांना एक क्षणभरही विश्रांती घेता येत नाही. अंनिसचे काम अत्यंत मोलाचे आहे. त्यामुळेच आज त्याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विचारांमध्ये मतभेद असले तरी कोणाचाही व्देष न करता वाटचाल करणे अत्यंत महत्वाचे असते. प्रत्येकाने नेणिवेचे रुपांतर जाणिवेत करणे आवश्यक आहे.

डॉ. दिलीप शिंदे यांनी पुरस्कारप्राप्त राहुल थोरात यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश कराडकर यांनी केले तर आभार राजेश कराडकर यांनी मानले.

कार्यक्रमास प्रा. डॉ. बाबुराव गुरव, नामदेव माळी, अरूण दांडेकर, संजय ठिगळे, डॉ. संजय निटवे, प. रा. आर्डे, नामदेव भोसले, मुस्तफा मुजावर, डॉ. दिलीप शिंदे उपस्थित होते.

चौकट

विचार कृतीतून जिवंत ठेवला

राहुल थोरात म्हणाले, मला मिळालेला पुरस्कार हा जबाबदारीचा आहे. महाविद्यालयीन जीवनापासून अंनिसच्या कार्यात मी सहभागी झालो. दाभोलकर हे व्यक्ती नसून विचार आहेत. त्यांचा खून केल्याने अंनिसची चळवळ मागे पडेल असे सनातनींना वाटले. दाभोलकर असताना अंनिसच्या १५० शाखा होत्या. मात्र, हत्येनंतर त्या ३२० झाल्या आहेत. याचा अर्थच दाभोलकरांचा विचार प्रामुख्याने देशाच्या भावी पिढीला पटत आहे.