शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

Sangli: ताकारी योजनेचे पहिले आवर्तन डिसेंबरमध्ये; यंदा उशिरा पाणीपुरवठा, कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 16:27 IST

देवराष्ट्रे : पावसाळा संपला की कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ताकारी योजनेच्या आवर्तनाचे डोहाळे लागतात. मात्र यावर्षी ताकारी योजनेचे पहिले आवर्तन ...

देवराष्ट्रे : पावसाळा संपला की कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ताकारी योजनेच्या आवर्तनाचे डोहाळे लागतात. मात्र यावर्षी ताकारी योजनेचे पहिले आवर्तन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती ताकारीचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.यावर्षी पाऊस काळ चांगला असल्यामुळे अजून जमिनीमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच ओढ्या, नाल्यांमधून अजून पाणी वाहत आहे. तलाव तुडुंब आहेत. त्यामुळे शेतीला अजून तरी पाणीटंचाईची झळ लागत नाही. तरीसुद्धा ज्या परिसरात पाणीसाठा उपलब्ध नाही तसेच डोंगराळ भागातील विहिरींनी तळ गाठला आहे, अशा भागांसाठी सोय केली जाणार आहे. सोनहिरा परिसरात तसेच कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये ताकारी योजना कधी चालू होणार याची चर्चा सुरू झाली आहे.याबाबत ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना पुरेसे पाणी यावर्षी उपलब्ध होणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी कमी पडणार नाही, याची दक्षता पाटबंधारे विभागाने आधीच घेतली आहे. जरा उशिरा म्हणजे डिसेंबरमध्ये आवर्तन सुरू होणार असले तरीसुद्धा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत भरपूर पाणी मिळेल, याची दक्षता पाटबंधारे विभागाने घेतली आहे. तत्पूर्वी जरी पाणीटंचाई निर्माण होऊ लागली तरी ताकारी योजनेचे आवर्तन चालू केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आवर्तन सुरु रहावेपाऊस भरपूर झाला असला तरी माळरानावरची पिके पाण्याविना जास्त काळ तग धरत नाहीत. त्यामुळे ही पिके वाळून जातात अथवा सुकतात, त्यामुळे या पिकांना नोव्हेंबर महिन्यात ताकारी योजनेचे आवर्तन चालू करून पाणी दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. तसेच पिकेही वाळणार नाहीत, त्यामुळे आवर्तन नोव्हेंबरमध्ये चालू होणे गरजेचे आहे, असे मत शेतकरी वैभव जाधव यांनी व्यक्त केले

उत्पन्न वाढेल

नोव्हेंबर महिन्यात ताकारी योजनेचे आवर्तन चालू झाल्यास त्याचा पिकांना दिलासा मिळेल तसेच वेळेत पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल, असे मत मोहिते वडगाव येथील शेतकरी विनोद मोहिते यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी