शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Sangli: ताकारी योजनेचे पहिले आवर्तन डिसेंबरमध्ये; यंदा उशिरा पाणीपुरवठा, कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 16:27 IST

देवराष्ट्रे : पावसाळा संपला की कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ताकारी योजनेच्या आवर्तनाचे डोहाळे लागतात. मात्र यावर्षी ताकारी योजनेचे पहिले आवर्तन ...

देवराष्ट्रे : पावसाळा संपला की कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ताकारी योजनेच्या आवर्तनाचे डोहाळे लागतात. मात्र यावर्षी ताकारी योजनेचे पहिले आवर्तन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती ताकारीचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.यावर्षी पाऊस काळ चांगला असल्यामुळे अजून जमिनीमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच ओढ्या, नाल्यांमधून अजून पाणी वाहत आहे. तलाव तुडुंब आहेत. त्यामुळे शेतीला अजून तरी पाणीटंचाईची झळ लागत नाही. तरीसुद्धा ज्या परिसरात पाणीसाठा उपलब्ध नाही तसेच डोंगराळ भागातील विहिरींनी तळ गाठला आहे, अशा भागांसाठी सोय केली जाणार आहे. सोनहिरा परिसरात तसेच कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये ताकारी योजना कधी चालू होणार याची चर्चा सुरू झाली आहे.याबाबत ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना पुरेसे पाणी यावर्षी उपलब्ध होणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी कमी पडणार नाही, याची दक्षता पाटबंधारे विभागाने आधीच घेतली आहे. जरा उशिरा म्हणजे डिसेंबरमध्ये आवर्तन सुरू होणार असले तरीसुद्धा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत भरपूर पाणी मिळेल, याची दक्षता पाटबंधारे विभागाने घेतली आहे. तत्पूर्वी जरी पाणीटंचाई निर्माण होऊ लागली तरी ताकारी योजनेचे आवर्तन चालू केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आवर्तन सुरु रहावेपाऊस भरपूर झाला असला तरी माळरानावरची पिके पाण्याविना जास्त काळ तग धरत नाहीत. त्यामुळे ही पिके वाळून जातात अथवा सुकतात, त्यामुळे या पिकांना नोव्हेंबर महिन्यात ताकारी योजनेचे आवर्तन चालू करून पाणी दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. तसेच पिकेही वाळणार नाहीत, त्यामुळे आवर्तन नोव्हेंबरमध्ये चालू होणे गरजेचे आहे, असे मत शेतकरी वैभव जाधव यांनी व्यक्त केले

उत्पन्न वाढेल

नोव्हेंबर महिन्यात ताकारी योजनेचे आवर्तन चालू झाल्यास त्याचा पिकांना दिलासा मिळेल तसेच वेळेत पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल, असे मत मोहिते वडगाव येथील शेतकरी विनोद मोहिते यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी