शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Sangli: ताकारी योजनेचे पहिले आवर्तन डिसेंबरमध्ये; यंदा उशिरा पाणीपुरवठा, कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 16:27 IST

देवराष्ट्रे : पावसाळा संपला की कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ताकारी योजनेच्या आवर्तनाचे डोहाळे लागतात. मात्र यावर्षी ताकारी योजनेचे पहिले आवर्तन ...

देवराष्ट्रे : पावसाळा संपला की कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ताकारी योजनेच्या आवर्तनाचे डोहाळे लागतात. मात्र यावर्षी ताकारी योजनेचे पहिले आवर्तन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती ताकारीचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.यावर्षी पाऊस काळ चांगला असल्यामुळे अजून जमिनीमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच ओढ्या, नाल्यांमधून अजून पाणी वाहत आहे. तलाव तुडुंब आहेत. त्यामुळे शेतीला अजून तरी पाणीटंचाईची झळ लागत नाही. तरीसुद्धा ज्या परिसरात पाणीसाठा उपलब्ध नाही तसेच डोंगराळ भागातील विहिरींनी तळ गाठला आहे, अशा भागांसाठी सोय केली जाणार आहे. सोनहिरा परिसरात तसेच कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये ताकारी योजना कधी चालू होणार याची चर्चा सुरू झाली आहे.याबाबत ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना पुरेसे पाणी यावर्षी उपलब्ध होणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी कमी पडणार नाही, याची दक्षता पाटबंधारे विभागाने आधीच घेतली आहे. जरा उशिरा म्हणजे डिसेंबरमध्ये आवर्तन सुरू होणार असले तरीसुद्धा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत भरपूर पाणी मिळेल, याची दक्षता पाटबंधारे विभागाने घेतली आहे. तत्पूर्वी जरी पाणीटंचाई निर्माण होऊ लागली तरी ताकारी योजनेचे आवर्तन चालू केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आवर्तन सुरु रहावेपाऊस भरपूर झाला असला तरी माळरानावरची पिके पाण्याविना जास्त काळ तग धरत नाहीत. त्यामुळे ही पिके वाळून जातात अथवा सुकतात, त्यामुळे या पिकांना नोव्हेंबर महिन्यात ताकारी योजनेचे आवर्तन चालू करून पाणी दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. तसेच पिकेही वाळणार नाहीत, त्यामुळे आवर्तन नोव्हेंबरमध्ये चालू होणे गरजेचे आहे, असे मत शेतकरी वैभव जाधव यांनी व्यक्त केले

उत्पन्न वाढेल

नोव्हेंबर महिन्यात ताकारी योजनेचे आवर्तन चालू झाल्यास त्याचा पिकांना दिलासा मिळेल तसेच वेळेत पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल, असे मत मोहिते वडगाव येथील शेतकरी विनोद मोहिते यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी