शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
6
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
7
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
8
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
9
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
10
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
11
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
12
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
13
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
14
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
15
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
16
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
17
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
18
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
19
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Sangli: म्हैसाळच्या नवीन धरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:43 IST

पावसाळ्यात नदीकाठची शेती उद्ध्वस्त होणार का ? : शेतकऱ्यांचा सवाल

सुशांत घोरपडेम्हैसाळ : म्हैसाळ येथे एक टीएमसी क्षमतेचे नवीन धरण बांधण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. मात्र, हे धरण झाल्यावर नदीकाठी शेतजमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती पाण्याखाली जाणार का ? असा प्रश्न नदीकाठी जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना पडू लागला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कृष्णा नदीकाठी म्हैसाळ, कनवाड, ढवळी, कुटवाड या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी या नदीकाठी आहेत. पावसाळ्यात नदीकाठी असणाऱ्या सर्व शेतात पाणी जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शेतीचा नदीकडेचा भाग नदीपात्रात कोसळून जातो. महापूर आल्यास महिनाभर शेतातील पाणी जात नाही. या परिस्थितीतून जात असताना आता नव्याने बांधत असलेल्या नवीन बराजची शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे हा नवीन बंधारा झाल्यास नदीपात्रात पाणी किती साठणार? पावसाळ्यात किती फूट पाणी वाढणार ? असे अनेक प्रश्न नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतावू लागले आहेत. सध्या कृष्णानदीवर कोल्हापूर पद्धतीचा जुना बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा करणे शक्य होत होते. या पाणीसाठ्यावर दोन ते तीन दिवस म्हैसाळ योजना सुरू राहत असते. आता नवीन बराज झाल्यास या धरणाची क्षमता एक टीएमसी इतकी होणार असून यामुळे म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. या धरणामुळे ८१ हजार ६९७ हेक्टर क्षेत्रास या योजनेचा लाभ होणार आहे. म्हैसाळ नवीन बराजमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसोबत संवाद हवा !म्हैसाळ, कनवाड, ढवळी, कुटवाड या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या नदीकाठी आहेत. या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची गरज आहे.

आमच्या जमिनी नदीकाठी आहेत. नवीन बराज झाल्यास बॅक वॉटरमुळे शेती पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. याबाबत लवकरच शेतकऱ्यांना सोबत घेऊन अर्ज करणार आहे. - एम. डी. पाटील, शेतकरी, म्हैसाळ

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजDamधरणFarmerशेतकरी