शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: म्हैसाळच्या नवीन धरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:43 IST

पावसाळ्यात नदीकाठची शेती उद्ध्वस्त होणार का ? : शेतकऱ्यांचा सवाल

सुशांत घोरपडेम्हैसाळ : म्हैसाळ येथे एक टीएमसी क्षमतेचे नवीन धरण बांधण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. मात्र, हे धरण झाल्यावर नदीकाठी शेतजमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती पाण्याखाली जाणार का ? असा प्रश्न नदीकाठी जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना पडू लागला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कृष्णा नदीकाठी म्हैसाळ, कनवाड, ढवळी, कुटवाड या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी या नदीकाठी आहेत. पावसाळ्यात नदीकाठी असणाऱ्या सर्व शेतात पाणी जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शेतीचा नदीकडेचा भाग नदीपात्रात कोसळून जातो. महापूर आल्यास महिनाभर शेतातील पाणी जात नाही. या परिस्थितीतून जात असताना आता नव्याने बांधत असलेल्या नवीन बराजची शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे हा नवीन बंधारा झाल्यास नदीपात्रात पाणी किती साठणार? पावसाळ्यात किती फूट पाणी वाढणार ? असे अनेक प्रश्न नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतावू लागले आहेत. सध्या कृष्णानदीवर कोल्हापूर पद्धतीचा जुना बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा करणे शक्य होत होते. या पाणीसाठ्यावर दोन ते तीन दिवस म्हैसाळ योजना सुरू राहत असते. आता नवीन बराज झाल्यास या धरणाची क्षमता एक टीएमसी इतकी होणार असून यामुळे म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. या धरणामुळे ८१ हजार ६९७ हेक्टर क्षेत्रास या योजनेचा लाभ होणार आहे. म्हैसाळ नवीन बराजमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसोबत संवाद हवा !म्हैसाळ, कनवाड, ढवळी, कुटवाड या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या नदीकाठी आहेत. या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची गरज आहे.

आमच्या जमिनी नदीकाठी आहेत. नवीन बराज झाल्यास बॅक वॉटरमुळे शेती पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. याबाबत लवकरच शेतकऱ्यांना सोबत घेऊन अर्ज करणार आहे. - एम. डी. पाटील, शेतकरी, म्हैसाळ

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजDamधरणFarmerशेतकरी