शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’साठी कडेगावात उपोषण आणि तोडगा

By admin | Updated: August 28, 2015 23:06 IST

अधिकाऱ्यांची मध्यस्थी : कालव्याचा मार्ग मोकळा; चार गावांतील शेतकऱ्यांना दिलासा

कडेगाव : विहापूर (ता. कडेगाव) येथील टेंभू योजनेचा पोटकालवा जेसीबीच्या साहाय्याने बुजविण्यात आला आहे. यामुळे बेलवडे, निमजोड, सोहोली, सासपडे या चार गावांतील शेतीचे पाणी बंद झाले आहे. हा पोटकालवा खुदाई करून पाणी मिळावे, या मागणीसाठी रवींद्र शंकर सूर्यवंशी, विशाल विश्वनाथ सूर्यवंशी, पोपट विठोबा मुळीक, मनोज किसनराव मोहिते या चार शेतकऱ्यांनी आज सकाळी बेमुदत उपोषण सुरू केले. परंतु टेंभू योजनेचे अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला आणि उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले.विहापूर येथील काशिनाथ चव्हाण या शेतकऱ्याने त्यांच्या शेतामधून नियमबाह्य व चुकीच्या पद्धतीने पोटकालवा खुदाई झाल्याचा दावा करून हा पोटकालवा बुजवून घेतला. यामुळे पुढील चार गावांना योजनेचे पाणी मिळत नाही. ऐन दुष्काळी परिस्थितीत पिके कोमेजून चालली आहेत. अशा परिस्थितीत पाणी मागणीसाठी शुक्रवारी बेलवडे, निमजोड, सोहोली व सासपडे येथील चौघांनी उपोषण सुरू केले होते. दरम्यान, काशिनाथ चव्हाण या शेतकऱ्यानेही, माझ्या शेतातून अन्यायी व बेकायदेशीर कालवा खुदाई झाली असल्याची कागदपत्रे दाखल करून आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.यावर टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता तानाजी जेंगटे, उपकार्यकारी अभियंता एस. एम. पाटील, कडेगावचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार हेमंत निकम, पोलीस निरीक्षक अशोक कदम, विहापूर येथील राजाराम चव्हाण यांनी टेंभू योजनेच्या कार्यालयात बैठक घेऊन तोडगा काढला.काशिनाथ चव्हाण यांच्या शेतामधून गेलेल्या पोटकालव्याच्या भराव्याच्या दोन्ही बाजू त्यांना शेतीपिकासाठी वापरण्यास सांगितल्या, तसेच कमीत कमी जागेत कालवा खुदाई करून पुढील गावांना पाणी देण्याचा सर्वसमावेशक निर्णय झाला. तसेच भूसंपादनाची कार्यवाही लवकर करून काशिनाथ चव्हाण यांना संपादित जमिनीचा तात्काळ मोबदला देण्याचाही निर्णय झाला. यामुळे आता तात्काळ कालवा खुदाई होईल आणि चारही गावांच्या शेतजमिनीला पाणी मिळेल, असा सर्वमान्य तोडगा काढण्यात आला.तोडगा निघाल्यावर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपकार्यकारी अभियंता एस. एम. पाटील, पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी उपोषणकर्त्या ग्रामस्थांना सरबत दिले आणि उपोषणाची सांगता झाली. यावेळी सुरेश घार्गे, सागरेश्वर सूतगिरणीचे संचालक विक्रम मोहिते, सुरेश यादव, सोनहिरा साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण पोळ यांच्यासह मान्यवर, ग्रामस्थ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)