शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषी संजीवनी’ला शेतकऱ्यांचाच ठेंगा!

By admin | Updated: September 23, 2014 23:58 IST

जिल्ह्यातील स्थिती : ८३ कोटींची थकबाकी, भरले केवळ ५.२९ कोटी; शासनाच्या चुकांमुळे थकबाकीचा डोंगर

अशोक डोंबाळे - सांगली -राज्य शासन आणि महावितरणने निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांकडील थकित वीज बिल वसुलीसाठी आॅगस्टमध्ये आणलेल्या कृषी संजीवनी योजनेला थकबाकीदारांनी ठेंगा दाखवला आहे. जिल्ह्यातील एक लाख २४ हजार ३१५ ग्राहकांकडे ८३ कोटी रुपये वीज बिल थकित आहे. यापैकी १४ हजार ६९९ ग्राहकांनी केवळ पाच कोटी २९ लाख रुपये भरल्यामुळे महावितरण कंपनी आर्थिक कोंडीत सापडली आहे.दुष्काळ, अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वीज बिल वेळेवर भरता आले नाही. त्यातच महावितरणच्या काही चुकीच्या बिलांचाही परिणाम झाला. त्यामुळे दुष्काळात राज्य शासनाने शंभर टक्के वीज बिल सवलतीची घोषणा केली. मात्र त्यानंतर ३३ टक्केच वीज बिल सवलतीचा आदेश आला. शासनाच्या धरसोड निर्णयामुळे कृषी पंपांच्या थकबाकीचा डोंगर वाढला. यामध्ये काही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक वीज बिल भरले नसल्याचेही दिसून आले. त्यामुळे थकबाकी वसूल करण्यासाठी शासनाने दोन महिन्यांपूर्वी कृषी संजीवनी योजना आणली. या योजनेत थकबाकीच्या ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यानंतर ५० टक्के रक्कम शासन महावितरणला देणार होते. शेतकऱ्यांनी ५० टक्के थकबाकीची रक्कम भरण्यासाठी महावितरणने तीन हप्ते करून दिले होते. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ आॅगस्टची मुदत होती. या कालावधित शेतकऱ्यांनी थकबाकी भरावी म्हणून महावितरणने धडपड केली. जिल्ह्यातील ८३ कोटी थकबाकीपैकी शेतकऱ्यांकडून ४१ कोटी ५० लाख रुपये वसूल होणे अपेक्षित होते. ही रक्कम वसूल झाल्यानंतर ४१ कोटी ५० लाख रुपये शासन अनुदान म्हणून महावितरणला देणार होते. मात्र शेतकऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या योजनेला ठेंगा दाखवल्याचे वसुलीच्या आकडेवारीवरून दिसत आहे. ४१ कोटी ५० लाखापैकी आतापर्यंत केवळ पाच कोटी २९ लाख रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित ३६ कोटी २१ लाख कसे वसूल करायचे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना भेडसावत आहे. आता महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या योजनेतून थकबाकी भरण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु, हा कालावधी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीचा असल्यामुळे मुदतवाढ दिल्याने थकबाकी वसूल होणार का, याचीही अधिकाऱ्यांना चिंता आहे.विभागनिहाय कृषी पंपांची वसुलीइस्लामपूर : १५ हजार ७९२ ग्राहक : तीन कोटी नऊ लाख थकबाकी : एक कोटी २४ लाख वसुली अपेक्षित. त्यापैकी केवळ ५९ लाख वसूलकवठेमहांकाळ : ४९ हजार २५० ग्राहक : १८ कोटी ७८ लाख थकबाकी : सात कोटी ५१ लाख वसुली अपेक्षित. त्यापैकी एक कोटी एक लाख वसूल सांगली ग्रामीण : २९ हजार २९० ग्राहक : नऊ कोटी ४२ लाख थकबाकी : तीन कोटी ७७ लाख वसुलीची गरज : एक कोटी ६५ लाख वसूलसांगली शहर : ५७३ ग्राहक : १२ लाख थकबाकी : पाच लाख वसुली होणे अपेक्षित : केवळ तीन लाख वसूल विटा : २९ हजार २४३ ग्राहक : आठ कोटी १९ लाख थकबाकी : तीन कोटी २८ लाख वसुलीची गरज : एक कोटी ३३ लाख वसूल