शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

सांगलीत शेतकरी संघटनेतर्फे १२ रोजी देशव्यापी परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 2:12 PM

सांगली : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर देशव्यापी लढा निश्चित करण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी सांगलीत देशव्यापी शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद ...

ठळक मुद्देसांगलीत शेतकरी संघटनेतर्फे १२ रोजी देशव्यापी परिषदलढ्याची दीशा ठरणार: रघुनाथदादा पाटील

सांगली : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर देशव्यापी लढा निश्चित करण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी सांगलीत देशव्यापी शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, कापडविक्रीतून शेतकऱ्यांचे व भारतीयांचे शोषण करणाऱ्या ब्रिटीश सरकारविरुद्ध हुतात्मा बाबू गेणू यांनी १२ डिसेंबर १९३0 रोजी विदेशी कापडाने भरलेल्या ट्रकसमोर हौतात्म्य पत्करले होते. भारतीय शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक व शेतकऱ्यांचे पंचप्राण म्हणून ओळखले जाणारे शरद जोशी यांनीही १२ डिसेंबर २0१५ रोजी शेवटचा श्वास घेतला होता. त्यामुळे याच तारखेस शेतकरी हुतात्मा स्मृती परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेस पंजाबचे शेतकरी नेते सतनाम सिंग, समशेरसिंह दहिया, कन्हैय्यालाल सिहाग, लालबहादूर शास्त्री यांचे वंशज संजयसिंह नाथ, तामिळनाडूचे देवसिंग मणी, नित्या मोहोर, आंध्रप्रदेशचे जनरल रेड्डी आदी उपस्थित राहणार आहेत. सांगलीच्या रेल्वे स्थानकाजवळील कल्पतरु मंगल कार्यालयात १२ डिसेंबरला दुपारी १ वाजता परिषद होणार आहे.ऊसाला प्रतिटन चार हजार दर द्या, अन्यथा दोन कारखान्यांमधील अंतराची अटक काढून टाका, आपत्ती निवारण कायद्यात दुष्काळाचा, महापुराचा समावेश करून जिरायत शेतीला एकरी ५0 हजार रुपये, बागायत शेतीला १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, गोवंश हत्या बंदी, वन्यजीव संरक्षण, पाळीव प्राण्यांशी निर्दयी वागणूक, आवश्यक वस्तू कायदा, भू-संपादन, कमाल जमीन धारणा इत्यादी शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेची पुनर्स्थापना करण्यात यावी, सरसकट सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीज बिलातून मुक्त करावे, शेतकऱ्यांना बाजाराचे, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळायला हवे, शेतीमालावरील निर्यातबंदी उठवावी, रेडी रेकनर प्रमाणे शेतीला कर्जपुरवठा करावा आदी मागण्यांची चर्चा या परिषदेत केली जाणार आहे.शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना देशव्यापी लढ्याची दिशाही निश्चित केली जाणार आहे. अशा अनेक परिषदांचे आयोजन वेगवेगळ््या ठिकाणी केले जाणार आहे. सांगलीत कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तरप्रदेश याठिकाणचे शेतकऱ्यांचे नेते उपस्थित राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही परिषद अत्यंत महत्त्वाची व क्रांतिकारी ठरणार आहे, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली