शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

संचारबंदीच्या काळातही १८,५८५ पॉझिटिव्ह, पंधरा दिवसांनंतरही रुग्ण कमी होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संचारबंदीच्या काळात कोरोना रुग्णसंख्या वाढतच असून या पंधरा दिवसांत जिल्ह्यात तब्बल १८ हजार ५८५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : संचारबंदीच्या काळात कोरोना रुग्णसंख्या वाढतच असून या पंधरा दिवसांत जिल्ह्यात तब्बल १८ हजार ५८५ लोक पॉझिटिव्ह आले आहेत. संचारबंदीतही नागरिकांचा सुरू असलेला मुक्तसंचार या गोष्टीस कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे.

रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य शासनाने पंधरा दिवसांची संचारबंदी जाहीर केली होती. या काळात लोकांच्या संचाराला आळा बसून संसर्ग कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, चित्र उलटेच झाले आहे. संचारबंदीच्या काळापूर्वी असलेल्या आकडेवारीपेक्षा संचारबंदीतील कोरोनाची आकडेवारी अधिक चिंताजनक आहे. या काळात पॉझिटिव्हीटी रेट, मृत्यूदर अधिक दिसून येत आहे. त्यामुळे संचारबंदीचे काय फलित मिळाले, असा सवाल आता उपस्थित होत आहे. संचारबंदीचा हा काळ मोठा होता. आता पुन्हा आठवडाभराचा लॉकडाऊन सुरू झाला असल्याने या काळात तरी गर्दी नियंत्रणात राहणार का, अशी शंका उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात सध्या उपलब्ध बेडची संख्या जवळपास संपुष्टात आली आहे. बेड मिळविण्यासाठी लोकांची कसरत सुरू आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर व लसीची टंचाई आहे. अशा काळात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे, मात्र, लोकांच्या बेशिस्तपणामुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढत आहे.

चौकट

ग्राफसाठी

३१ मार्च ते १४ एप्रिल टेस्टिंग ४३५९३

पॉझिटिव्ह ६,२७९

रुग्णालयातून सुटी २,९५२

या काळातील पॉझिटिव्हीटी रेट १४.४० टक्के

कोरोनामुक्ती दर ५० टक्के

चौकट

१५ एप्रिल ते १ मे टेस्टिंग ८१,५५७

पॉझिटिव्ह १८,०८२

कोरोनामुक्त १०,३००

या काळात पॉझिटिव्हीटी रेट २२.१७ टक्के

कोरोनामुक्तीचा दर ५५.४२ टक्के

चौकट

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात नागरिकांचा रस्त्यावर मुक्तसंचार सुरू होता. किराणा माल, भाजीपाला खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी शहरात होती.

बससेवा सुरू असल्याने जिल्ह्याबाहेरील लोक विनातपासणी शहरात, गावांत येत होते. त्यांची तपासणी न झाल्याने त्यांच्यामुळेही संसर्ग वाढला.

लसीकरण केंद्रांवरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. तसेच त्याठिकाणी कोविड चाचणीही सुरू राहिल्याने कोरोनाला निमंत्रण मिळाले.

चौकट

यामुळे वाढले ग्रामीण भागात रुग्ण

ग्रामीण भागातही परजिल्ह्यातून येणाऱ्या लाेकांची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे गावागावांमध्ये रुग्णसंख्या वाढत गेली.

संचारबंदीपूर्वी अनिर्बंध विवाहसोहळे, त्याठिकाणची गर्दी, स्मशानभूमीत होणारी गर्दी संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरली.