शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सांगलीत ‘महाआघाडी’च्या नेत्यांमध्ये विधानसभेपूर्वीच कुरघोड्या

By अशोक डोंबाळे | Updated: July 1, 2024 18:12 IST

जतमध्ये ‘विश्वजीत’ना जयंतरावांचा शह 

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यातील जत, मिरज व खानापूर - आटपाडी या तीन विधानसभा मतदारसंघांत तयाच्या सूचना काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दवसेना या पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. यावरून विधानसभा जागा वाटपापूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण चांगलेच तापले आहे.नूतन खासदार विशाल पाटील यांचा आठवड्यापूर्वी सांगलीत मेळावा झाला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व पलूस - कडेगावचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जनतेने भरभरून मदत केली आहे. कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. काँग्रेस पक्षाकडे जिल्ह्यातील पलूस - कडेगाव, सांगली, जत, मिरज, खानापूर - आटपाडी अशा पाच जागा मागणार आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. या मेळाव्यानंतर उध्दवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी खानापूर - आटपाडी आणि जत विधानसभा मतदारसंघावर उध्दवसेनेचाच दावा आहे. या जागेवर अन्य कुणीही दावा सांगू नये, अशी मागणी केली होती.चार दिवसांपूर्वी सांगलीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरूण लाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, ‘वाळवा, शिराळा आणि तासगाव - कवठेमहांकाळ येथे आमच्याच पक्षाचे आमदार आहेत. आता जिल्ह्यातील आणखी तीन जागा पक्षाला मिळवाव्या लागतील. यासाठी मिरज, जत व खानापूर - आटपाडीतील कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे.’खानापूर-आटपाडीसाठी दोन्ही काँग्रेसचा दावाखानापूर - आटपाडीचे प्रतिनिधीत्व करणारे अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले. ही जागा सध्या रिक्त असली तरी या ठिकाणी शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून आमदार बाबर यांची निवड झाली होती. त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता. तरीही या जागेवर उध्दवसेनेने दावा केला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही दावा केल्याने महाविकास आघाडीत जागा वाटपापूर्वीच नेत्यांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण रंगले आहे.जतमध्ये ‘विश्वजीत’ना जयंतरावांचा शह डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यात पाच आमदार काँग्रेसचे निवडून आणायचे आहेत, असे जाहीर वक्तव्य केले. सध्या पलूस - कडेगाव आणि जत या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व काँग्रेसकडे आहे. जतमध्ये डॉ. कदम यांचे नातेवाइक आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत हे आमदार आहेत. त्यांनाच काँग्रेसकडून संधी दिली जाण्याची शक्यता असताना राष्ट्रवादीनेही येथे तयारी सुरू केल्याने हा एक प्रकारे कदम यांना शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणVishwajeet Kadamविश्वजीत कदमJayant Patilजयंत पाटीलcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना