शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सांगली जिल्ह्यातील अकरा प्राथमिक शाळा शिक्षकांविनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:39 IST

यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलटला तरी, शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ मिटलेला नाही.

ठळक मुद्देबदल्यांच्या घोळामुळे शिक्षकांच्या जागा रिक्ततात्पुरत्या सोयीवरच शाळांचे कामकाज;आदेश असतानाही दुर्गम भागातच निर्माण झाला मोठा प्रश्न

 सांगली : यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलटला तरी, शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ मिटलेला नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, जिल्हा परिषदेच्या ११ शाळांमध्ये शिक्षकच नसल्याची बाब समोर आली आहे. शिक्षण विभागाने अन्य शाळांतील शिक्षकांची तात्पुरती सोय केली असली तरी, त्याचा शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे.

यंदा जिल्ह्यातील २ हजार १६५ शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्याची प्रक्रिया झाली. हे करत असताना सर्व तालुक्यात समान रिक्त पदे ठेवण्यासह अतिरिक्त शिक्षकांच्या शाळेचाही विचार केला नसल्याचेच दिसून येत आहे.जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा आढावा घेतला, तर १ हजार ६९८ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांसाठी ६ हजार ४३१ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी ५ हजार ८०६ शिक्षक कार्यरत आहेत. ७६० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त पदांपैकी सर्वाधिक ३५० शिक्षकांच्या जागा फक्त जत तालुक्यातच रिक्त आहेत. यासह आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील पदेही रिक्त आहेत. ग्रामविकास विभागाने बदली प्रक्रिया राबविताना दुर्गम भागातील रिक्त जागा भरण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तरीही याच भागातील अनेक शाळा शिक्षकांविना ओस पडल्या आहेत.शिक्षकांसाठी पाठपुरावाजिल्हा परिषदेच्यावतीने रिक्त जागांवर शिक्षक मिळावेत, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. आॅनलाईन बदली प्रक्रियेतून शिक्षक मिळण्याची व दुर्गम भागातील शाळांची सोय होईल, ही अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरल्याने आता उर्वरित जागांसाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शिक्षक नसलेल्या ठिकाणी शेजारच्या शाळेतील शिक्षकांना काही काळासाठी जबाबदारी देण्यात आली आहे.जिल्ह्यातील शून्यशिक्षकी शाळा...जिल्ह्यातील शिक्षकच नसलेल्या अकरा शाळांमध्ये देशमुखवाडी (आटपाडी), जत तालुक्यातील बनाळी, जाडरबोबलाद, मुचंडी, उमदी, वाळकेवाडी, वळसंग, विहापूर (ता. कडेगाव), आरळा (ता. शिराळा), कोरेगाव (ता. वाळवा) या गावांतील शाळांचा समावेश आहे.

टॅग्स :SchoolशाळाSangliसांगलीTeacherशिक्षक