शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

ई-सात-बारा लाभात सांगलीजिल्हा शेवटून पाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:02 IST

मंदगतीने चालणारी क्लाऊड यंत्रणा आणि अन्य तांत्रिक कारणांनी सांगली जिल्ह्यातील सात-बारा उताऱ्यांचे संगणकीकरण होऊनही त्याचा लाभ नागरिकांना मिळत नसल्याचे दिसत आहे. राज्यभरात १३ लाख

ठळक मुद्दे तांत्रिक गोंधळ : केवळ २५९ जणांकडून डाऊनलोड

सांगली : मंदगतीने चालणारी क्लाऊड यंत्रणा आणि अन्य तांत्रिक कारणांनी सांगली जिल्ह्यातील सात-बारा उताऱ्यांचे संगणकीकरण होऊनही त्याचा लाभ नागरिकांना मिळत नसल्याचे दिसत आहे. राज्यभरात १३ लाख ८७ हजार ९११ लोकांनी डिजिटल सात-बारा डाऊनलोड केले असून, यात सांगलीतील डाऊनलोडची संख्या केवळ २५९ इतकीच आहे. लाभार्थींच्या या यादीत सांगली जिल्हा राज्यात शेवटून पाचवा आहे.

सांगली जिल्ह्यातील शासकीय दस्तऐवजांचे स्कॅनिंग करून त्याचे डिजिटल जतन करण्याचे काम गतीने झाले. १ कोटी ६ लाख ३२ हजार कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. डिजिटल सात-बारा अपलोड करण्याचे कामही शंभर टक्के पूर्ण झाल्याचे यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले होते. तरीही या डिजिटल दाखल्यांचा लाभ जनतेला होताना दिसत नाही. डिजिटल सात-बाºयाची ही यंत्रणा क्लाऊड यंत्रणेवर अवलंबून आहे. सध्या पुणे विभागात येणाºया सर्व जिल्ह्यांची क्लाऊड यंत्रणा ही बीएसएनएलची आहे. त्याची गती ही खासगी कंपन्यांच्या तुलनेत खूपच कमी असल्याने डिजिटल सात-बारे दिसणे आणि डाऊनलोेड करणे यात अनेक अडचणी येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने खासगी कंपनीचे क्लाऊड कॉम्प्युटिंग प्राप्त व्हावे म्हणून पाठपुरावाही केला होता, मात्र त्यांना यश मिळाले नाही.

शेतकरी, नागरिकांकडून आॅनलाईन सात-बारा संकेतस्थळावर भेटी देण्याचे प्रमाण अधिक असले तरी, डाऊनलोड करण्यामध्ये त्यांना अडचणी आल्याने जिल्ह्याची घसरण झाली आहे. राज्यात अत्यंत कमी प्रतिसाद लाभलेल्या शेवटच्या पाच जिल्ह्यात सांगली जिल्ह्याचा समावेश झाला आहे. डिजिटल सात-बारा उताºयाचा गोंधळ गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. याचा फटका शेतकºयांनाही बसला. जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी सूत्रे स्वीकारताच प्राधान्याने सात-बारा संगणकीकरणाचे काम पूर्ण करून घेतले. पुणे विभागात सर्वात वेगाने सात-बारा अपलोडिंगचे काम सांगली जिल्ह्यात झाले आहे.

अधिकाºयांनी व कर्मचाºयांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून काम अंतिम टप्प्यात आणले असले तरी, वरिष्ठ पातळीवरून सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे. शासनाच्याच घोषणेनुसार महाराष्टÑदिनी १ मे २०१८ पासून राज्यात डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा देण्याची योजना सुरू करण्यात येणार होती. मात्र, कधी सर्व्हरवर ‘ताण’ येऊन यंत्रणा कोलमडली, तर कधी क्लाउड यंत्रणेच्या मंदगतीमुळे अडचणी वाढल्या.जिल्ह्यातील शेतकरी : यंत्रणेवर नाराजशेतकºयांचे तलाठी कार्यालयातील हेलपाटे कमी व्हावेत, अत्यंत कमी कालावधित उतारा मिळेल, या अपेक्षेने शेतकºयांनी आॅनलाईन प्रणालीचे स्वागत केले होते. मात्र त्यांचा याबाबत अपेक्षाभंग झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात त्यांना याचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे.हे जिल्हे आघाडीवरडिजिटल सात-बारा डाऊनलोड करणाऱ्यांमध्ये जालना जिल्हा सर्वप्रथम असून, त्याखालोखाल उस्मानाबाद, अकोला, हिंगोली, यवतमाळ, औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.

यावेळेत सर्वाधिक डाऊनलोडराज्यभरात डिजिटल सात-बारा उतारे डाऊनलोड होण्याच्या वेळांचे वर्गीकरण करण्यात आले असून, सकाळी १० ते ५ या कार्यालयीन वेळेतच सर्वाधिक दाखले डाऊनलोड झाल्याचे दिसून आले. सायंकाळी ५ ते रात्री १२ या वेळेत फार कमी प्रमाणात दाखले डाऊनलोड झाल्याचे दिसते.

सांगलीतील संगणकीय सात-बारा यंत्रणा कधी गतीने कार्यान्वित होणार याचा अंदाज कोणालाही नाही. त्यामुळे संकेतस्थळाला भेटी देणाऱ्या जिल्ह्यातील लोकांची संख्याही घटत आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनSangliसांगली