शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

सांगली जिल्ह्यात विधानसभेला आता ‘आयाराम-गयाराम’ पॅटर्न; पाडापाडीमध्ये काही नेत्यांना रस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 16:54 IST

रात्रीस चाले पक्ष बदलाचा खेळ

सांगली : लोकसभेला सांगली पॅटर्न राज्यात नव्हे, तर देशात चर्चेत आला. आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आयाराम-गयाराम चर्चेत आले आहेत. यंदाच्या विधानसभेला तिकीट मिळविण्यासाठी माजी खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले. भाजपचे मोहन वनखंडे हे काँग्रेसमध्ये गेले. अर्ज भरेपर्यंत आणखी काय बदल पाहायला मिळणार? याची उत्सुकता वाढली आहे.राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. तसेच सांगली पॅटर्नमुळे चर्चेत आलेल्या सांगली जिल्ह्यातही काही लक्षवेधी लढती पाहायला मिळतील, असे चित्र आहे. जिल्ह्यात निवडून येण्याबरोबर पाडापाडीचे राजकारण केले जाणार, यात कोणतीही शंका नाही. स्वत: निवडून येण्यापेक्षा दुसऱ्याला पाडण्यात काहींना जास्त रस दिसतो, अशी काही मतदारसंघांतील स्थिती आहे. राज्य पातळीवरील कुरघोड्यांचे राजकारण नेतेमंडळींनी जिल्हा पातळीवर आणले आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाआघाडी आणि महायुतीमध्ये जागा कोणाला द्यायच्या, यावरून चर्चा झाली आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात चित्र स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील जागा वाटपाकडे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यात तिकीट मिळविण्यासाठी काहींनी पक्षांतर केले.माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत उडी मारली. त्यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पूत्र रोहित पाटील यांच्याविरुद्ध ते शड्डू ठोकतील. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडेही शिवसेनेतून तिकडे त्यांच्या मदतीसाठी गेले. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरुद्ध शड्डू ठोकण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

आणखी आयारामांची उत्सुकता ..काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळालेले विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात गेले. भाजपचे प्रा. मोहन वनखंडे यांनी पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणातील आयाराम-गयाराम चर्चेत आले आहेत. या यादीत आणखी कोणाची भर पडणार ते लवकरच दिसून येईल.

उमेदवारीसाठी कायपण?मिरजेची जागा उद्धवसेनेला मिळू शकते म्हणून यापूर्वीच सिद्धार्थ जाधव यांनी शिवबंधन बांधून घेतले आहे. मिरजेत वंचितची उमेदवारी मिळते म्हणून राष्ट्रवादीचे युवानेते विज्ञान माने तिकडे गेले. तसेच शेवटच्या टप्प्यापर्यंत उमेदवारीसाठी आणखी काय पाहायला मिळणार? याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हाध्यक्ष पक्ष बदलाने कार्यकर्ते संभ्रमात..मोठ्या राजकीय पक्षात जिल्हाध्यक्ष हे महत्त्वाचे पद असते. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी, तसेच पक्षाचा चेहरा म्हणून या पदाला महत्त्व असते. परंतु रात्रीत जिल्हाध्यक्ष पक्ष बदलत असल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडल्याचे चित्र दिसते. नेत्यांबरोबर काही कार्यकर्त्यांचीही फरफट या निमित्ताने पाहायला मिळत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीPoliticsराजकारण