शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

दुष्काळाची दाहकता वाढली- सांगली जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 11:57 PM

जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढली असून, ७५ गावे आणि ४९९ वाड्या-वस्त्यांमधील एक लाख ५९ हजार नागरिकांना ६९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टंचाईच्या वाढत्या झळा लक्षात घेऊन

ठळक मुद्दे७५ गावे, ४९९ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी

 सांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढली असून, ७५ गावे आणि ४९९ वाड्या-वस्त्यांमधील एक लाख ५९ हजार नागरिकांना ६९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टंचाईच्या वाढत्या झळा लक्षात घेऊन जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने १९ कोटी १५ लाख ८५ हजारांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. छावण्या अथवा चारा डेपोची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असल्यामुळे पशुधनाच्या चाºयाचा जिल्ह्यातील प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यावर प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

वाढत्या पाणीटंचाईने जिल्ह्यातील बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात ६० टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. यामध्ये नऊ टँकरची भर पडली आहे. सध्या पाण्याअभावी हाता-तोंडाला आलेली पिकेही वाया गेली आहेत. राज्य शासनाने जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे.

दुष्काळी स्थिती वाढू लागली असल्याने जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडून गांभीर्याने उपाययोजना केल्या जात आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने टँकर सुरू करण्याच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या ७५ गावे, ७३४ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ५९ हजार लोकसंख्येला ६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जत तालुक्यातील ३४ गावे आणि २७९ वाड्या-वस्त्यांना ३८ टँकरने, आटपाडीतील २२ गावांमधील १७२ वाड्या-वस्त्यांना १८ टँकरने, खानापूरच्या सहा गावांना सहा टँकरने, तासगावमधील तीन गावे आणि १३ वाड्या-वस्त्यांना एका टँकरने, तर कवठेमहांकाळमधील १० आणि ४७ वाड्या-वस्त्यांना सहा टँकरने पाणी दिले जात आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी खासगी ८९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

मार्चअखेर १६९ टँकर सुरू करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्यासह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम भागातून उसाचे वाडे मागवले जात आहे, परंतु ते जादा दराने खरेदी करून जनावरांना जगविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकºयांनी कवडीमोल किमतीने जनावरांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यात टँकरने : पाणी पुरवठातालुका गावे वाड्या-वस्त्या लोकसंख्या टँकरजत ३४ २६७ ९७१०७ ३८क़महांकाळ १० ४७ १३७७२ ६तासगाव ३ १३ २१६४ १खानापूर ६ ० १२२१४ ६आटपाडी २२ १७२ ३४४५५ १८एकूण ७५ ४९९ १५९७१२ ६९पाण्यासाठी आंदोलने सुरूचसांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात अजूनही अनेक गावांमध्ये टँकरची मागणी होत आहे. त्यासाठी आंदोलनेही करण्यात येत आहेत. त्यामुळे टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दुष्काळग्रस्तांना सतावत आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली