शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची दाहकता वाढली- सांगली जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:58 IST

जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढली असून, ७५ गावे आणि ४९९ वाड्या-वस्त्यांमधील एक लाख ५९ हजार नागरिकांना ६९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टंचाईच्या वाढत्या झळा लक्षात घेऊन

ठळक मुद्दे७५ गावे, ४९९ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी

 सांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढली असून, ७५ गावे आणि ४९९ वाड्या-वस्त्यांमधील एक लाख ५९ हजार नागरिकांना ६९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टंचाईच्या वाढत्या झळा लक्षात घेऊन जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने १९ कोटी १५ लाख ८५ हजारांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. छावण्या अथवा चारा डेपोची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असल्यामुळे पशुधनाच्या चाºयाचा जिल्ह्यातील प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यावर प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

वाढत्या पाणीटंचाईने जिल्ह्यातील बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात ६० टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. यामध्ये नऊ टँकरची भर पडली आहे. सध्या पाण्याअभावी हाता-तोंडाला आलेली पिकेही वाया गेली आहेत. राज्य शासनाने जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे.

दुष्काळी स्थिती वाढू लागली असल्याने जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडून गांभीर्याने उपाययोजना केल्या जात आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने टँकर सुरू करण्याच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या ७५ गावे, ७३४ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ५९ हजार लोकसंख्येला ६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जत तालुक्यातील ३४ गावे आणि २७९ वाड्या-वस्त्यांना ३८ टँकरने, आटपाडीतील २२ गावांमधील १७२ वाड्या-वस्त्यांना १८ टँकरने, खानापूरच्या सहा गावांना सहा टँकरने, तासगावमधील तीन गावे आणि १३ वाड्या-वस्त्यांना एका टँकरने, तर कवठेमहांकाळमधील १० आणि ४७ वाड्या-वस्त्यांना सहा टँकरने पाणी दिले जात आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी खासगी ८९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

मार्चअखेर १६९ टँकर सुरू करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्यासह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम भागातून उसाचे वाडे मागवले जात आहे, परंतु ते जादा दराने खरेदी करून जनावरांना जगविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकºयांनी कवडीमोल किमतीने जनावरांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यात टँकरने : पाणी पुरवठातालुका गावे वाड्या-वस्त्या लोकसंख्या टँकरजत ३४ २६७ ९७१०७ ३८क़महांकाळ १० ४७ १३७७२ ६तासगाव ३ १३ २१६४ १खानापूर ६ ० १२२१४ ६आटपाडी २२ १७२ ३४४५५ १८एकूण ७५ ४९९ १५९७१२ ६९पाण्यासाठी आंदोलने सुरूचसांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात अजूनही अनेक गावांमध्ये टँकरची मागणी होत आहे. त्यासाठी आंदोलनेही करण्यात येत आहेत. त्यामुळे टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दुष्काळग्रस्तांना सतावत आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली