शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

दुष्काळाची तीव्रता : प्रत्येक गावपातळीवर पर्जन्यमापक केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:05 IST

सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळ निवारणासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, उपाययोजना करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी आता गावपातळीवर पर्जन्यमापक केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

ठळक मुद्देदुष्काळाची तीव्रता : प्रत्येक गावपातळीवर पर्जन्यमापक केंद्र कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली माहिती

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळ निवारणासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, उपाययोजना करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी आता गावपातळीवर पर्जन्यमापक केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.खोत म्हणाले की, जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ निर्माण झाला आहे. या दुष्काळ निवारणार्थ शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या आठ उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही जनतेच्या मागणीनुसार तिथे आवश्यक वाटेल तिथे सोयी-सुविधा देण्यात येत आहेत.

दुष्काळ निवारणासाठी निधीची तरतूद करताना त्या भागातील पर्जन्यमान विचारात घेतले जाते. दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करतानाही पावसाचे प्रमाण पाहिले जाते. सध्याच्या परिस्थितीनुसार मंडलनिहाय पर्जन्यमापक केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी होणारा पाऊस संपूर्ण मंडलासाठी गृहीत धरून निर्णय घेतले जातात. परंतु, यामुळे मंडलमधील एखाद्या गावावर अन्याय होऊ शकतो. यावर उपाय म्हणूनच आता प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमापक केंद्र उभा करण्यात येणार आहे.

गावनिहाय पर्जन्यमापक केंद्राची उभारणी केल्यानंतर पावसाची अचूक आकडेवारी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्याद्वारे दुष्काळी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येणार आहे. हा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्रांची उभारणी करण्यात येईल.ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी समूह गटाची स्थापना करण्यात येणार आहे. या शेतकरी समूह गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचल्यास शेतकऱ्यांना दरही चांगला मिळेल. प्रत्येक गावानुसार शेतमालाचे वैशिष्ट्य ठरत असते. याचा उपयोग करून घेऊन शेतमालाचे ब्रँडिंग करण्याचा विचार आहे.विटा येथे द्राक्ष, पाणी, देठ तपासणी केंद्राची उभारणी करण्यात येत असून, त्यासाठी आतापर्यंत सात लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सध्या या केंद्राच्या उभारणीसाठी अजूनही काही निधीची आवश्यकता असून, तोही निधी लवकरच देण्यात येणार आहे, असेही खोत म्हणाले.

टॅग्स :droughtदुष्काळSatara areaसातारा परिसरRainपाऊस