शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची तीव्रता : प्रत्येक गावपातळीवर पर्जन्यमापक केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:05 IST

सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळ निवारणासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, उपाययोजना करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी आता गावपातळीवर पर्जन्यमापक केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

ठळक मुद्देदुष्काळाची तीव्रता : प्रत्येक गावपातळीवर पर्जन्यमापक केंद्र कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली माहिती

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळ निवारणासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, उपाययोजना करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी आता गावपातळीवर पर्जन्यमापक केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.खोत म्हणाले की, जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ निर्माण झाला आहे. या दुष्काळ निवारणार्थ शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या आठ उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही जनतेच्या मागणीनुसार तिथे आवश्यक वाटेल तिथे सोयी-सुविधा देण्यात येत आहेत.

दुष्काळ निवारणासाठी निधीची तरतूद करताना त्या भागातील पर्जन्यमान विचारात घेतले जाते. दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करतानाही पावसाचे प्रमाण पाहिले जाते. सध्याच्या परिस्थितीनुसार मंडलनिहाय पर्जन्यमापक केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी होणारा पाऊस संपूर्ण मंडलासाठी गृहीत धरून निर्णय घेतले जातात. परंतु, यामुळे मंडलमधील एखाद्या गावावर अन्याय होऊ शकतो. यावर उपाय म्हणूनच आता प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमापक केंद्र उभा करण्यात येणार आहे.

गावनिहाय पर्जन्यमापक केंद्राची उभारणी केल्यानंतर पावसाची अचूक आकडेवारी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्याद्वारे दुष्काळी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येणार आहे. हा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्रांची उभारणी करण्यात येईल.ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी समूह गटाची स्थापना करण्यात येणार आहे. या शेतकरी समूह गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचल्यास शेतकऱ्यांना दरही चांगला मिळेल. प्रत्येक गावानुसार शेतमालाचे वैशिष्ट्य ठरत असते. याचा उपयोग करून घेऊन शेतमालाचे ब्रँडिंग करण्याचा विचार आहे.विटा येथे द्राक्ष, पाणी, देठ तपासणी केंद्राची उभारणी करण्यात येत असून, त्यासाठी आतापर्यंत सात लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सध्या या केंद्राच्या उभारणीसाठी अजूनही काही निधीची आवश्यकता असून, तोही निधी लवकरच देण्यात येणार आहे, असेही खोत म्हणाले.

टॅग्स :droughtदुष्काळSatara areaसातारा परिसरRainपाऊस