शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

दुष्काळाची तीव्रता : प्रत्येक गावपातळीवर पर्जन्यमापक केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:05 IST

सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळ निवारणासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, उपाययोजना करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी आता गावपातळीवर पर्जन्यमापक केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

ठळक मुद्देदुष्काळाची तीव्रता : प्रत्येक गावपातळीवर पर्जन्यमापक केंद्र कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली माहिती

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळ निवारणासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, उपाययोजना करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी आता गावपातळीवर पर्जन्यमापक केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.खोत म्हणाले की, जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ निर्माण झाला आहे. या दुष्काळ निवारणार्थ शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या आठ उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही जनतेच्या मागणीनुसार तिथे आवश्यक वाटेल तिथे सोयी-सुविधा देण्यात येत आहेत.

दुष्काळ निवारणासाठी निधीची तरतूद करताना त्या भागातील पर्जन्यमान विचारात घेतले जाते. दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करतानाही पावसाचे प्रमाण पाहिले जाते. सध्याच्या परिस्थितीनुसार मंडलनिहाय पर्जन्यमापक केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी होणारा पाऊस संपूर्ण मंडलासाठी गृहीत धरून निर्णय घेतले जातात. परंतु, यामुळे मंडलमधील एखाद्या गावावर अन्याय होऊ शकतो. यावर उपाय म्हणूनच आता प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमापक केंद्र उभा करण्यात येणार आहे.

गावनिहाय पर्जन्यमापक केंद्राची उभारणी केल्यानंतर पावसाची अचूक आकडेवारी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्याद्वारे दुष्काळी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येणार आहे. हा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्रांची उभारणी करण्यात येईल.ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी समूह गटाची स्थापना करण्यात येणार आहे. या शेतकरी समूह गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचल्यास शेतकऱ्यांना दरही चांगला मिळेल. प्रत्येक गावानुसार शेतमालाचे वैशिष्ट्य ठरत असते. याचा उपयोग करून घेऊन शेतमालाचे ब्रँडिंग करण्याचा विचार आहे.विटा येथे द्राक्ष, पाणी, देठ तपासणी केंद्राची उभारणी करण्यात येत असून, त्यासाठी आतापर्यंत सात लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सध्या या केंद्राच्या उभारणीसाठी अजूनही काही निधीची आवश्यकता असून, तोही निधी लवकरच देण्यात येणार आहे, असेही खोत म्हणाले.

टॅग्स :droughtदुष्काळSatara areaसातारा परिसरRainपाऊस