शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जिल्ह्यात पावणेदोनशे टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: May 19, 2017 23:43 IST

जिल्ह्यात पावणेदोनशे टँकरनेपिण्याच्या पाण्याचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १६८ गावे आणि १,२७१ वाड्या-वस्त्यांवरील तीन लाख ८५ हजार ४६८ नागरिकांची तहान १७२ टँकरद्वारे भागविली जात आहे. जत तालुक्यात टँकर भरण्यासाठीही पुरेस पाणी मिळत नसल्याच्या टँकर चालकांच्या तक्रारी आहेत. टंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत असून पाण्याबरोबरच पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.दुष्काळ किंवा टंचाई जणू काही जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, कडेगाव, मिरज पूर्व तालुक्यांच्या पाचवीलाच पूजलेली असावी, असे चित्र आहे. गावोगावी खासगी पाण्याच्या टँकरची चलती आहे. शुद्ध पाणी मिळत नाही म्हणून नागरिक पाणी विकत घेतात. काही गावांतील पाणीपुरवठ्याच्या योजना ३० ते ३५ वर्षे जुन्या झाल्या आहेत. दुरुस्ती किंवा नव्या योजनांची कामे वेळेत सुरू होत नाहीत. पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार पाणीटंचाईचे एक कारण मानले जाते. दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या ताकारी, टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजना कधी पूर्ण होणार, याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. चांदोली धरणापासून जवळ असणाऱ्या शिराळा तालुक्यातील दुरंदेवाडी, माधळगाव, खराळे-चिंचेवाडीतही टंचाई असल्यामुळे तेथे टँकर सुरू करावे लागले.जिल्ह्यातील २८ लाख २० हजार ५७५ लोकसंख्येपैकी तीन लाख ८५ हजार ४६८ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जलयुक्त शिवार योजनेतील कामे झाल्याचे अधिकारी कागदोपत्रीच दाखवत आहेत. पण, त्या योजनांमध्ये पाणीच साठत नसल्यामुळे तेथील गावांमध्येही जिल्हा प्रशासनाला टँकर सुरू करावे लागले आहेत. ८२ पाझर तलावांमध्ये केवळ ९ टक्केच पाणीसाठा असल्यामुळे नागरिकांसाठी आणि पशुधनासाठी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये टँकर भरण्यासाठीही पाणी नसल्यामुळे टँकर चालकांना वीस ते तीस किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. जत तालुक्यातील १२३ गावांपैकी ८४ गावे आणि ७८० वाड्या-वस्त्यांवरील दोन लाख २४ हजार ९३ हजार लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक टँकर जत तालुक्यात आहेत.जिल्ह्यातील गावे आणि टँकरने पाणी पुरवठातालुकागावेवाड्यालोकसंख्याटँकरजत८४७८०२२४०९३९५क़महांकाळ२०१०४३४०६४१६तासगाव१८१९३५१२९२२०खानापूर१८३५३७६१५१७आटपाडी२६१५५३४९६८२१शिराळा२४१४३६३एकूण१६८१२७१३८३४६८१६८जलयुक्त शिवार योजनेतील गावातही आता टँकरने पाणीजलयुक्त शिवार अभियानामध्ये २०१५-१६ वर्षात जिल्ह्यातील १४१ गावांत ३७८६ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी ३४४६ कामे पूर्ण झाली. येथील जलसंधारणाच्या प्रकल्पामध्ये ३९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्याचे उद्दिष्ट होते. २०१६-१७ मध्ये १४० गावांची निवड केली होती. साखळी सिमेंट बंधारे, सिमेंट बंधारे दुरुस्ती, कंपार्टमेंट बंडिंग, सलग समतल चर आदी २१० कामांवर १५ कोटींचा निधी खर्च झाला आहे. येथील कामांमध्ये ८० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्याचे शासकीय यंत्रणेचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात जलसंधारणाची कामेही झाली आणि ११५ कोटींचा निधी खर्च झाला. मात्र आता जलयुक्त शिवारमधील गावांमध्ये शेतीला सोडा, पण प्यायलाही पुरेसे पाणी नाही. सर्वच गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. याचाच अर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जलयुक्त शिवार योजनेतून टँकरमुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न पूर्ण होणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.