शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

अलमट्टी म्हणजे भारत-पाकिस्तान आहे का, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 17:15 IST

सांगली : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून, त्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलावीत. भयमुक्त महाराष्ट्र ...

सांगली : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून, त्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलावीत. भयमुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत रविवारी व्यक्त केली. अलमट्टी धरणाच्या उंचीवरून आठवले यांनी भारत-पाकिस्तानची तुलना केली. उंची वाढवण्यास विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आठवले म्हणाले, पुण्यातील घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्याकडील व्हिडीओ पाहिले असता, वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या नसून, हत्याच आहे, हे स्पष्ट होते. दोन कोटी रुपये वैष्णवीच्या आई-वडिलांनी द्यावेत, या मागणीसाठी वैष्णवीचा सतत छळ केला जात हाेता. तिला त्रास दिला जात होता. याप्रकरणी जे संशयित आरोपी आहेत, त्या सर्वांवर खुनाचा गुन्हा नोंद करावा. यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात दलित आणि महिलांवर अत्याचार वाढत असून, ते रोखण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलावीत.

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास आमचा विरोध असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, कर्नाटक आणि महाराष्ट्र म्हणजे भारत पाकिस्तान आहे का ? अलमट्टीची उंची वाढवल्यास त्याचा धोका परिसरातील गावांना होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देवू, तसेच कर्नाटक सरकारशीही समन्वय साधू, असे स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संधी द्याआठवले म्हणाले, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका होतील. महायुतीकडून रिपाइंला या निवडणुकीत जागा मिळाव्यात, याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरात लवकर बैठक घ्यावी.

ठोकळे यांच्याकडे राज्याची जबाबदारीमाझ्या दौऱ्यात कार्यकर्ते दिसून येतात, मात्र त्यानंतर रिपाइं दिसून येत नाही. पूर्वी पँथरच्या माध्यमातून दलित, शोषितांसाठी लढा उभारला जायचा. तसे काम अपेक्षित आहे. माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्याकडे राज्याची जबाबदारी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सांगलीसह राज्यात चांगली बांधणी केली जाईल.

२९ मेला मुंबईत महारॅलीआठवले म्हणाले, पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. त्यांच्या या शौर्याचे कौतुक करण्यासाठी ‘रिपाइं’तर्फे भारत जिंदाबाद महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २९ मे रोजी मुंबईत ही महारॅली होईल.

टॅग्स :SangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवलेWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीDamधरणfloodपूरKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र