शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

अलमट्टी म्हणजे भारत-पाकिस्तान आहे का, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 17:15 IST

सांगली : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून, त्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलावीत. भयमुक्त महाराष्ट्र ...

सांगली : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून, त्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलावीत. भयमुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत रविवारी व्यक्त केली. अलमट्टी धरणाच्या उंचीवरून आठवले यांनी भारत-पाकिस्तानची तुलना केली. उंची वाढवण्यास विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आठवले म्हणाले, पुण्यातील घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्याकडील व्हिडीओ पाहिले असता, वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या नसून, हत्याच आहे, हे स्पष्ट होते. दोन कोटी रुपये वैष्णवीच्या आई-वडिलांनी द्यावेत, या मागणीसाठी वैष्णवीचा सतत छळ केला जात हाेता. तिला त्रास दिला जात होता. याप्रकरणी जे संशयित आरोपी आहेत, त्या सर्वांवर खुनाचा गुन्हा नोंद करावा. यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात दलित आणि महिलांवर अत्याचार वाढत असून, ते रोखण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलावीत.

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास आमचा विरोध असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, कर्नाटक आणि महाराष्ट्र म्हणजे भारत पाकिस्तान आहे का ? अलमट्टीची उंची वाढवल्यास त्याचा धोका परिसरातील गावांना होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देवू, तसेच कर्नाटक सरकारशीही समन्वय साधू, असे स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संधी द्याआठवले म्हणाले, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका होतील. महायुतीकडून रिपाइंला या निवडणुकीत जागा मिळाव्यात, याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरात लवकर बैठक घ्यावी.

ठोकळे यांच्याकडे राज्याची जबाबदारीमाझ्या दौऱ्यात कार्यकर्ते दिसून येतात, मात्र त्यानंतर रिपाइं दिसून येत नाही. पूर्वी पँथरच्या माध्यमातून दलित, शोषितांसाठी लढा उभारला जायचा. तसे काम अपेक्षित आहे. माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्याकडे राज्याची जबाबदारी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सांगलीसह राज्यात चांगली बांधणी केली जाईल.

२९ मेला मुंबईत महारॅलीआठवले म्हणाले, पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. त्यांच्या या शौर्याचे कौतुक करण्यासाठी ‘रिपाइं’तर्फे भारत जिंदाबाद महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २९ मे रोजी मुंबईत ही महारॅली होईल.

टॅग्स :SangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवलेWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीDamधरणfloodपूरKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र