शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

एकवेळ काम नको, पण भ्रष्टाचार टाळा, सांगलीत चंद्रकांतदादांचा भाजपच्या सरपंचांना कानमंत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 18:50 IST

एकवेळ काम न केले तरी चालेल, पण भ्रष्टाचार अजिबात करू नका, असा कानमंत्र बुधवारी महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या नूतन सरपंचांच्या मेळाव्यात दिला. कर्नाळ रस्त्यावरील मंगल कार्यालयात मेळावा पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, माजी आमदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देभाजपच्या नूतन सरपंचांच्या मेळाव्यात चंद्रकांतदादांचा कानमंत्रभ्रष्टाचाररहीत कार्यपद्धती ग्रामपंचायत स्तरावरही टिकविता आली पाहिजेनिविदा घेणारी व्यक्ती सरपंचांचे कोणी नातेवाईक असता कामा नये

सांगली : एकवेळ काम न केले तरी चालेल, पण भ्रष्टाचार अजिबात करू नका, असा कानमंत्र बुधवारी महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या नूतन सरपंचांच्या मेळाव्यात दिला.

कर्नाळ रस्त्यावरील मंगल कार्यालयात मेळावा पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, माजी आमदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतींसाठी वेगवेगळ््या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा येणार आहे. निवडून आलेल्या सरपंचांनी चांगले काम करायला हवे. पैशाचा योग्य विनियोग व्हायला हवा. एक रुपयाचेही काम केले नाही तरी चालेल, पण भ्रष्टाचार करू नका.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत सर्वांनी जपलेली भ्रष्टाचाररहीत कार्यपद्धती ग्रामपंचायत स्तरावरही टिकविता आली पाहिजे. निविदा घेणारी व्यक्ती सरपंचांचे कोणी नातेवाईक असता कामा नये. गावाने वाहवा केली पाहिजे, असे काम करा.

सांगली जिल्ह्यातील पक्षाला मिळालेले यश पाहिल्यानंतर आश्चर्य वाटते. कधीही इतके यश जिल्ह्यात भाजपने पाहिले नव्हते. ग्रामपंचायतीत १८६ सरपंच आमचे निवडून येतील, असा विचारही केला नव्हता. लोकसभेमध्ये भाजपला जिल्ह्यात यश मिळाले, तेव्हा विरोधकांनी हा मोदींचा प्रभाव असल्याचा गाजावाजा केला. त्यानंतर विधानसभेतही चार आमदार निवडून आले तेव्हासुद्धा मोदींचा प्रभाव व ही सूज असल्याची टीका त्यांनी केली.

नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर जेव्हा आम्ही जिंकलो, तेव्हा विरोधकांना काय होत आहे, ते कळून चुकले. मोदींच्या प्रभावाबरोबरच हा पक्षीय वाटचालीवरचा लोकांचा विश्वास आहे. लोकांनी चांगली कामे करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश भाजपच्या पदरात टाकले आहे. या संधीचे सोने करीत लोकांच्या अपेक्षा नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पूर्ण कराव्यात, त्यासाठी गतीने विकासकामे करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेला निवडून आले. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर ते मतदारसंघातही जात नाहीत, कारण त्यांना पाच वर्षातील कामावर भरोसा असतो. जी व्यक्ती पाचवेळा निवडून येते, त्याच्या कामाची वेगळी पावती द्यायची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलSangliसांगलीBJPभाजपा