शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

एकवेळ काम नको, पण भ्रष्टाचार टाळा, सांगलीत चंद्रकांतदादांचा भाजपच्या सरपंचांना कानमंत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 18:50 IST

एकवेळ काम न केले तरी चालेल, पण भ्रष्टाचार अजिबात करू नका, असा कानमंत्र बुधवारी महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या नूतन सरपंचांच्या मेळाव्यात दिला. कर्नाळ रस्त्यावरील मंगल कार्यालयात मेळावा पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, माजी आमदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देभाजपच्या नूतन सरपंचांच्या मेळाव्यात चंद्रकांतदादांचा कानमंत्रभ्रष्टाचाररहीत कार्यपद्धती ग्रामपंचायत स्तरावरही टिकविता आली पाहिजेनिविदा घेणारी व्यक्ती सरपंचांचे कोणी नातेवाईक असता कामा नये

सांगली : एकवेळ काम न केले तरी चालेल, पण भ्रष्टाचार अजिबात करू नका, असा कानमंत्र बुधवारी महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या नूतन सरपंचांच्या मेळाव्यात दिला.

कर्नाळ रस्त्यावरील मंगल कार्यालयात मेळावा पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, माजी आमदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतींसाठी वेगवेगळ््या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा येणार आहे. निवडून आलेल्या सरपंचांनी चांगले काम करायला हवे. पैशाचा योग्य विनियोग व्हायला हवा. एक रुपयाचेही काम केले नाही तरी चालेल, पण भ्रष्टाचार करू नका.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत सर्वांनी जपलेली भ्रष्टाचाररहीत कार्यपद्धती ग्रामपंचायत स्तरावरही टिकविता आली पाहिजे. निविदा घेणारी व्यक्ती सरपंचांचे कोणी नातेवाईक असता कामा नये. गावाने वाहवा केली पाहिजे, असे काम करा.

सांगली जिल्ह्यातील पक्षाला मिळालेले यश पाहिल्यानंतर आश्चर्य वाटते. कधीही इतके यश जिल्ह्यात भाजपने पाहिले नव्हते. ग्रामपंचायतीत १८६ सरपंच आमचे निवडून येतील, असा विचारही केला नव्हता. लोकसभेमध्ये भाजपला जिल्ह्यात यश मिळाले, तेव्हा विरोधकांनी हा मोदींचा प्रभाव असल्याचा गाजावाजा केला. त्यानंतर विधानसभेतही चार आमदार निवडून आले तेव्हासुद्धा मोदींचा प्रभाव व ही सूज असल्याची टीका त्यांनी केली.

नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर जेव्हा आम्ही जिंकलो, तेव्हा विरोधकांना काय होत आहे, ते कळून चुकले. मोदींच्या प्रभावाबरोबरच हा पक्षीय वाटचालीवरचा लोकांचा विश्वास आहे. लोकांनी चांगली कामे करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश भाजपच्या पदरात टाकले आहे. या संधीचे सोने करीत लोकांच्या अपेक्षा नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पूर्ण कराव्यात, त्यासाठी गतीने विकासकामे करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेला निवडून आले. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर ते मतदारसंघातही जात नाहीत, कारण त्यांना पाच वर्षातील कामावर भरोसा असतो. जी व्यक्ती पाचवेळा निवडून येते, त्याच्या कामाची वेगळी पावती द्यायची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलSangliसांगलीBJPभाजपा