शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत 'स्वाभिमानी'च्या मोर्चात शेतकरी-पोलिसांमध्ये झटापट, राजू शेट्टींनी केला मंत्री जयंत पाटलांचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:57 IST

एकरकमी एफआरपी देण्याच्या विरोधात पालकमंत्री जयंत पाटील यांनी कारखानदारांचे टोळके बनवले

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने एकरकमी एफआरपी देत असताना, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांकडून याला ठेंगा दाखवला जात आहे. याविरोधात आज, शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला तिरडी मोर्चा पोलिसांनी सांगली-मिरज रस्त्यावर विश्रामबाग येथे अडवला. यावेळी पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त शेतकरी आणि पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली. दरम्यान धक्काबुक्कीचा प्रकारही घडला.माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग चौकातून मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चा शांततेत चालू होता. विलिंग्डन महाविद्यालयाजवळ मोर्चा आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चौघे कार्यकर्ते तिरडी घेऊन मोर्चात सहभागी झाले. मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही कार्यकर्ते तिरडी घेऊन घुसल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. तिरडी हिसकावून घेण्यामध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला. तिरडी हिसकावून घेऊन पोलिसांनी मोर्चा पुढे सोडला.पोलिसांच्या या प्रकाराबद्दल राजू शेट्टी प्रचंड संतापले होते. शेट्टी म्हणाले, एकरकमी एफआरपी देण्याच्या विरोधात पालकमंत्री जयंत पाटील यांनी कारखानदारांचे टोळके बनवले आहे. परंतु व्याजासह पैसे वसूल करु. कारखानदारांचे प्रतिकात्मक मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर चाललो असताना पोलिसांनी त्याची विटंबना केली. या कृत्यामागे पालकमंत्र्यांचा हात असल्याबद्दल त्यांचा निषेध केला.या मोर्चात प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, सावकर मादनाईक, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या सरकारकडे मागण्या- नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान द्या.- वीज कनेक्शन तोडणे बंद करून १० तास दिवसा वीज द्या.- वजनातील काटामारी थांबवा.- द्राक्षपीक विमा योजना सक्षम करा.- द्राक्षबागांना आवरण कागदासाठी अनुदान द्या.- रासायनिक खते, कृषी साहित्य व पशुखाद्य दरवाढ मागे घ्या.- भूमी अधिग्रहण कायदा पूर्वीप्रमाणे लागू करा.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाPoliceपोलिस